देशात नवीन संविधान लिहलं जातंय; अबू आझमींचे खळबळजनक वक्तव्य

देशात नवीन संविधान लिहलं जातंय; अबू आझमींचे खळबळजनक वक्तव्य

समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व आमदार अबू आझमी काल अमरावती दौऱ्यावर होते. यादरम्यान त्यांनी भाजपवर टीका करताना खळबळजनक वक्तव्य केले आहे.

सूरज दहाट | अमरावती : समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व आमदार अबू आझमी काल अमरावती दौऱ्यावर होते. यादरम्यान त्यांनी अमरावतीच्या जमिल कॉलनी येथे मुस्लिम भागात जाहिर सभा घेतली. यात त्यांनी भाजपवर टीका करताना खळबळजनक वक्तव्य केले आहे. देशात नवीन संविधान लिहलं जात आहे, असा मोठा आरोप त्यांनी केला आहे.

देशात नवीन संविधान लिहलं जातंय; अबू आझमींचे खळबळजनक वक्तव्य
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात शिंदेगट-ठाकरे गटात हाणामारी

अबू आझमी म्हणाले की, देशात नवीन संविधान लिहणे सुरू आहे. तसेच नवीन संसद, राष्ट्रपती भवन, पंतप्रधान निवास तयार करणे सुरू आहे. पण, जुनी संसद पाडण्याला विरोध केला पाहिजे. या विरोधात आपण उभे राहिले पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं आहे. सर्वांच्या खात्यात 15 लाख रुपये पंतप्रधान मोदी टाकणार होते. दोन कोटी नोकऱ्या देणार होते. पण, अद्यापही दिलेल्या नाहीत. देशात बेरोजगारी वाढत आहे. तसेच, देश बरबाद होत आहे व याला जबाबदार पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे. अशी टीकाही आझमी यांनी केली

देशात नवीन संविधान लिहलं जातंय; अबू आझमींचे खळबळजनक वक्तव्य
आव्हाडांवरून अंधारेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा; म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांना त्यांच्या कारकिर्दीचे...

तर, अमरावतीत अलीकडे भाजपने लव्ह जिहादचे अनेक आरोप केले. याचा देखील समाचार आमदार अबू आझमी यांनी घेतला. 18 वर्षानंतर कोणीही कोणाशी लग्न करू शकते. अमरावतीच्या धारणीमध्ये लव्ह जिहादचा आरोप केला होता. यातील हिंदू मुलगी उच्चशिक्षित होती. लग्न लावत असताना तिने का तिथे वाचलं नाही. लग्न लावून देणारा देशमुख होता. तर मुलीवर दबाव टाकून मुस्लिम मुलांना फसवण्याचा हा डाव आहे. मुलींना धमकावून विरोधात बोलायला लावलं जात आहे. तर मुस्लिमांना फसवण्यासाठी टार्गेट केल जात आहे, असा पलटवार अबू आझमी यांनी केला. यात मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी हस्तक्षेप करायला पाहिजे, असंही त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com