अमित ठाकरेंचा सरकारला खळखट्याकचा इशारा; आजची पदयात्रा शांत, पण पुढच्या वेळी...

मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झाली आहे.

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झाली आहे. या प्रश्नावरून मनसेची आज कोकण जागर यात्रा निघाली आहे. रायगड ते रत्नागिरीपर्यंत या जागर यात्रेदरम्यान 8 ठिकाणी मनसे आंदोलन करणार आहे. मनसेच्या या जागर यात्रेचं नेतृत्व मनसे नेते अमित ठाकरे करत आहेत. यावेळी अमित ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला रस्त्यांच्या प्रश्नांवरुन खळखट्याक करण्याचा इशारा दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com