नितेश राणेंची राहुल गाधींवर टीका; नाना पटोले म्हणाले, बोलण्याच्या लायकीचे....
राज्यात सध्या मोठा प्रमाणात राजकीय गदारोळ सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये शाब्दिक वाद सुरु असताना अशातच नुकताच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंब्रिज आणि हॉवर्ड विद्यापीठात व्याख्यान दिले. त्यावरून भाजप राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका करत आहे. त्यावरूनच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राहुल गांधी यांची तुलना दाऊद इब्राहिम, ओसमा बिन लादेन यांच्याबरोबर केली आहे. त्यामुळे नितेश राणेंच्या या विधानाच्या विरोधात काॅंग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. नितेश राणेंच्या याच वक्तव्याचा आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी समाचार घेतला आहे.
काय म्हणाले नाना पटोले?
नितेश राणे यांच्या विधानावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, ज्यांचे काही महत्वच नाही. अशा लोकांबद्दल काय वक्तव्य करावं. नितेश राणे हे बोलण्याच्या लायकीचे नसून त्यामुळे त्यांच्याबद्दल अधिक बोलणार नसल्याचा खोचक टोला नाव घेता नितेश राणे यांना पटोलेंनी लगाविला.
पुढे ते म्हणाले की, भाजपकडून देशाचे संविधान संपवण्याचे काम सुरू धर्म, जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचाही प्रयत्न केला जातो आहे. ज्या संविधानाने चाय विक्रेत्याच्या मुलाला देशाचे प्रधानमंत्री बनविले त्याच देशाच्या संविधानाला संपविण्याचे काम भाजपाकडून होत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. ते भाजपाचे हैद्राबादचे आमदार टी.राजा सिंग यांनी 2025 मध्ये भारत हिंदुराष्ट्र होणार यावर प्रत्युतर देतांना ते बोलत होते.