राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्य! निलेश राणेंचा इशारा; ...तर महाराष्ट्र सहन करणार नाही

राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्य! निलेश राणेंचा इशारा; ...तर महाराष्ट्र सहन करणार नाही

राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल नवे वक्तव्य केल्याने राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. यावरुन विरोधकांनी राज्यापालांवर टीकेडी झोड उठवली आहे.

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी नेहमीच आपल्या वक्तव्यांनी चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. यावरुन विरोधकांनी राज्यापालांवर टीकेडी झोड उठवली आहे. अशातच, भाजप नेते निलेश राणे यांनी राज्यपाल कोश्यारींना खडे बोल सुनावले आहे.

राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्य! निलेश राणेंचा इशारा; ...तर महाराष्ट्र सहन करणार नाही
...असे ढोंगी सावरकर भक्तांना का वाटत नाही : संजय राऊत

निलेश राणे म्हणाले की, महामहीम राज्यपाल साहेब आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना आजच्या युगातला माणूस कितीही महान असला तरी होऊ शकत नाही. महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे, महाराज ही व्यक्ती नाही आमचा देव आहे आमची श्रद्धा आहे. महाराजांच्या जागेवर कोणाचीही तुलना करणं महाराष्ट्राला सहन होणार नाही, अशा शब्दांत त्यांनी राज्यपालांना लक्ष्य केले आहे.

तर, महाराष्ट्राच्या राज्यपालांना काय झालं? कधी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अभद्र वक्तव्य, तर कधी काय, त्यांनी आज तर छत्रपती शिवाजी महाराज यांना जुने नेते असं म्हटले आहे. त्यांनी असं बोलून शिवाजी महाराज आणि संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान केलाय, असा आरोप संजय राऊत यांनी राज्यपालांवर केली आहे. याशिवाय शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनीही राज्यपालांच्या वक्तव्यावर नाराजी दर्शवली आहे.

काय म्हणाले होते राज्यपाल?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी बोलत होते. यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी डीलिट पदवी देऊन गौरवण्यात आलं. यावेळी भाषण करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली.

आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो. तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण आहे? महाराष्ट्रातच तुम्हाला भेटून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे. इथेच मिळतील. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील, असं वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे.

राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्य! निलेश राणेंचा इशारा; ...तर महाराष्ट्र सहन करणार नाही
शेतकऱ्यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात विरोधकांनी फोडले फटाके; राहुल गांधी संतापले
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com