ठाकरे गटाचं विधीमंडळ सचिवांना पत्र; मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे आणि बजोरिया यांना अपात्र करा

ठाकरे गटाचं विधीमंडळ सचिवांना पत्र; मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे आणि बजोरिया यांना अपात्र करा

ठाकरे गटाला मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे आणि विप्लव बजोरिया यांनी काही दिवसांपूर्वी सोडचिठ्ठी दीली.
Published by :
Siddhi Naringrekar

ठाकरे गटाला मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे आणि विप्लव बजोरिया यांनी काही दिवसांपूर्वी सोडचिठ्ठी दीली. या तिघांनी पक्ष सोडल्यानंतर ठाकरे गटाने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नव्हती. मात्र आता अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गटाने एक मोठा निर्णय घेतला आहे.

ठाकरे गटाने विधीमंडळ सचिवांना पत्र पाठवून तीन आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक चांगलेच आक्रमक झाले. काँग्रेस आणि ठाकरे गटाने विधीमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन केले.

आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या तिघांना अपात्र करण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे. त्यामुळे विधीमंडळ सचिव काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com