'आफताबला आमच्या ताब्यात द्या, त्याचे 100 तुकडे करायला मनसे सज्ज'

'आफताबला आमच्या ताब्यात द्या, त्याचे 100 तुकडे करायला मनसे सज्ज'

दिल्लीतील तरुणीच्या हत्याकांडाने देशभरात एकच खळबळ उडाली आहे. वसईतील श्रध्दा वालकर तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.

मुंबई : दिल्लीतील तरुणीच्या हत्याकांडाने देशभरात एकच खळबळ उडाली आहे. वसईतील श्रध्दा वालकर तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणानंतर आफताबबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. यावर मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी संताप व्यक्त केला आहे.

'आफताबला आमच्या ताब्यात द्या, त्याचे 100 तुकडे करायला मनसे सज्ज'
श्रद्धा हत्याकांड : आज आफताबची नार्को टेस्ट होणार

मनोज चव्हाण म्हणाले की, खुनी अफताब हा महाराष्ट्राचा गुन्हेगार आहे. त्याला आमच्या ताब्यात द्या. त्याचे 100 तुकडे करण्यास मनसे सज्ज आहे. उद्या कोणी वकील त्याच्या जामीनाचा अर्ज करणार. अस करण्यापेक्षा हे कायदे बदलण गरजेचे आहे. जसे रांझे पाटलांनी स्त्रीवर अत्याचार केला म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकडे करुन त्याचा चौरंग केला. असाच कायदा देशात अंमलात आणणे गरजेचे आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

काय आहे प्रकरण?

मुळची वसईतील श्रद्धा वालकर आणि तिचा प्रियकर आफताब दिल्लीत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. परंतु, काही दिवसांमध्येच दोघांमध्ये भांडण सुरु झाले. या दरम्यान आफताब याने १८ मे रोजी श्रद्धाचा गळा आवळून हत्या केली व तिच्या शरीराचे ३५ तुकडे करून दररोज एक एक तुकडा जंगलात फेकल्याचेही सूत्रांकडून कळते. या हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे.

'आफताबला आमच्या ताब्यात द्या, त्याचे 100 तुकडे करायला मनसे सज्ज'
भाजप-मनसेचे राजकारण हे मोघलांच्या जमान्यातील; संजय राऊत म्हणाले, राहुल गांधींसारखी व्यक्ती...

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com