Jitendra Awhad | Prakash Ambedkar
Jitendra Awhad | Prakash AmbedkarTeam Lokshahi

पवारांवर केलेल्या आंबेडकरांच्या विधानावर जितेंद्र आव्हाडांचा इशारा; म्हणाले, सहन करणार...

मतभेद सगळ्यांचेच असतात, पण त्याच्यातून विष ओकलं जाऊ नये. हे पटण्यासारखं नाही.
Published by :
Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच नुकताच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या दिवशी म्हणजेच 23 जानेवारी रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच गदारोळ सुरु आहे. याच दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलही प्रकाश आंबेडकरांनी मोठे विधान केले होते. त्यावरच आता राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश आंबेडकरांना इशारा दिला आहे.

Jitendra Awhad | Prakash Ambedkar
'नमस्कार, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री लोकशाहीच्या विशेष बातमीपत्रात स्वागत करतो'

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या विधानावर प्रत्युत्तर देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, महाविकास आघाडी मधील घटक पक्षातील नेतृत्वाने किंवा त्यांच्या मित्रपक्षातील नेतृत्वाने शरद पवार साहेबांबद्दल बोलताना आदराने बोलावं. मतभेद सगळ्यांचेच असतात, पण त्याच्यातून विष ओकलं जाऊ नये. हे पटण्यासारखं नाही.तेव्हा सगळ्यांनीच काळजी घ्यावी. सत्तेसाठी वाटेल ते सहन करणार नाही. असा थेट इशारा जितेंद्र आव्हाड यांनी आंबेडकरांना दिला आहे.

काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?

शरद पवार हे आजही भाजपाबरोबर आहेत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा सकाळचा शपथविधी झाला होता. त्यानंतर तीन-चार दिवसाने एका वृत्तपत्रात अजित पवारांनी मुलाखत छापून आली होती. त्यात अजित पवारांनी सांगितलं की, लोक मला का दोष देत आहेत, समजत नाही. हे आमच्या पक्षांचं ठरलं होतं. मी फक्त पहिला गेलो. २०१९ च्या लोकसभेपूर्वीच हे ठरलं होतं, असे ते यावेळी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com