prakash ambedkar pm modi
prakash ambedkar pm modiTeam Lokshahi

नोटाबंदीच्या निर्णयामुळे झालेल्या मृत्यूला जबाबदार कोण : प्रकाश आंबेडकर

केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने आज सुनावणी झाली. यावेळी न्यायालयानं 2016 ची नोटाबंदी वैध ठरवली आहे.

मुंबई : केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने आज सुनावणी झाली. यावेळी न्यायालयानं 2016 ची नोटाबंदी वैध ठरवली आहे. यामुळे केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. यावरुन मात्र वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी नोटाबंदीच्या निर्णयामुळे झालेल्या मृत्यूला जवाबदार कोण, असा सवाल विचारला आहे. नेहमी बँकेतल्या नोटा बंद करण्याचा निर्णय आरबीआय घेते केंद्र सरकार नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.

prakash ambedkar pm modi
'आव्हाडांनी औरंगजेबाचे मंदिर उभारावे अन् उदघाटनाला अजित पवार, उद्धव ठाकरेंना बोलवावे'

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, रिझर्व बँक ऑफ इंडियाने दिनांक 10 मार्च 2017 रोजी त्यांच्या प्रकाशनामध्ये नोटाबंदीचा परिणाम अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रावर विपरीतपणे झाला आहे, असे म्हटले आहे. तथापि सर्वोच्च न्यायालयाने 2016 च्या नोटबंदीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करताना अचानकपणे घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळे झालेल्या मृत्यूची कोणतीही दखल घेतलेली दिसत नाही. कोणत्याही सिरीजच्या नोटा रद्द करणे किंवा त्या पुन्हा चलनात आणणे किंवा नोटबंदी करणे यामध्ये केंद्र सरकारने काय भूमिका घ्यावी याविषयीच्या संवैधानिक मुद्यावर अपेक्षित निकाल देण्यास सर्वोच्च न्यायालय सपशेल अपयशी ठरले आहे. या प्रश्नाला उत्तर देताना सर्वोच्च न्यायालयाने भविष्यात चलनच धोक्यात आणले आहे.

prakash ambedkar pm modi
धर्मवीर पदवी न लावण्याची संभाजीराजेंची भूमिका; इंद्रजीत सावंतांचा मोठा दावा

नेहमी बँकेतल्या नोटा बंद करण्याचा निर्णय आरबीआय घेते केंद्र सरकार घेत नाही. मागे 1978 मध्ये 10000 रुपये चलनाची नोट बंद करण्याचा निर्णय आरबीआय ने घेतला होता आणि भारत सरकारला कळवला होता. हे अगोदरचे उदाहरण असताना सर्वोच्च न्यायालयाने भारत सरकारने घेतलेल्या निर्णयावर कोणतीही टीका टिपण्णी केली नाही.

आरबीआयच्या कायद्याप्रमाणे रिजर्व्ह बँकेलाच बँक नोट जारी करण्याचा अधिकार आहे. केंद्र सरकारला नोटा प्रिंट करण्याचा, वितरीत करण्याचा अथवा रद्द करण्याचा अधिकार नाही. रिझर्व बँक केंद्र सरकारच्या आणि इतर भागधारकांच्या सल्ल्याने बँक नोटांची संख्या आणि नोटांची छपाई करते. आरबीआयला केंद्रीय बोर्डाच्या शिफारशी नुसार बँक नोट चलनातून काढून टाकता येते. रुपयाची क्रयशक्ती स्थिर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय खूप पुढे जाऊन निकाल देऊ शकले असते, परंतु हा निकाल उपरोक्त कलमे लक्षात घेता तुष्टीकरणाशिवाय काही नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.

prakash ambedkar pm modi
अजित पवार दिलगिरी व्यक्त करत नाहीत, तोपर्यंत... : चंद्रकांत पाटील

हे एक चांगले झाले की, न्यायमूर्ती नागरत्न म्हणाले, नोटाबंदीचा निर्णय हा बेकायदेशीर आहे आणि यामध्ये आरबीआयने स्वतःची स्वतंत्र बुध्दी न वापरता 24 तासात केलेला निर्णय आहे. तथापि, हा प्रश्न शिल्लक राहतोच की, नोटाबंदीच्या बेकायदेशीर आणि अनियमिततेच्या निर्णयामुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या मृत्यूची जबाबदारी कोणाची, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com