...तर हे खपवून घेतलं जाणार नाही; कर्नाटक निवडणुकीवरुन राज ठाकरेंचा इशारा

...तर हे खपवून घेतलं जाणार नाही; कर्नाटक निवडणुकीवरुन राज ठाकरेंचा इशारा

कर्नाटक निवडणुकीचे वातावरण तापले असून सर्वपक्षीयांनी प्रचार शिगेला पोहोचला आहे. अशात, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक निवेदन जारी केले आहे.

मुंबई : कर्नाटक निवडणुकीचे वातावरण तापले असून सर्वपक्षीयांनी प्रचार शिगेला पोहोचला आहे. अशात, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक निवेदन जारी केले आहे. कर्नाटकमधील सरकार मराठी माणसांना त्रास देणार असेल, मराठी भाषेची गळचेपी करण्याचा प्रयत्न करणार असेल, तर ते हे खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा राज ठाकरेंनी दिला. तसेच, मतदान करताना एकजुटीने मराठी उमेदवारालाच मतदान करा, असे आवाहनही सीमावर्तींना केले आहे.

...तर हे खपवून घेतलं जाणार नाही; कर्नाटक निवडणुकीवरुन राज ठाकरेंचा इशारा
राष्ट्रवादी मविआतून बाहेर पडणार? भुजबळ राऊतांवर भडकले

काय म्हणाले राज ठाकरे?

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या १० मे ला मतदान आहे. तिथल्या सीमाभागातील माझ्या मराठी मतदार बंधू-भगिनींना माझं आवाहन आहे की मतदान करताना एकजुटीने मराठी उमेदवारालाच मतदान करा. उमेदवार कुठल्या पक्षाचा का असेना तो मराठी असायला हवा, आणि त्याने निवडून आल्यावर मराठी भाषेची सुरु असलेली गळचेपी, मराठी माणसांवर सुरु असलेला वर्षानुवर्षांचा अन्याय ह्याविरोधात तिथल्या विधानभवनात वाचा फोडायलाच हवी.

तुम्ही ज्या राज्याचे आहात, त्या राज्याची भाषा, तिथली संस्कृती ह्याचा आदर केलाच पाहिजे, ह्या ठाम मताचा मी आहे. सीमाभागात कित्येक पिढ्या राहणारे बांधव कन्नड भाषा आणि इथली संस्कृती ह्याचा मान राखत आले आहेत. पण तरीही तिथलं सरकार जर मराठी माणसांना त्रास देणार असेल, मराठी भाषेची गळचेपी करण्याचा प्रयत्न करणार असेल तर ते हे खपवून घेतलं जाणार नाही.

मध्यंतरी जेव्हा पुन्हा एकदा सीमावादाला कर्नाटक सरकारकडून खतपाणी घालून वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा मी म्हणालं होतं की कर्नाटक आणि महाराष्ट्रात मुळात एकजिनसीपणा आहे. इथल्या अनेकांची कुलदैवतं कर्नाटकात आहेत तर अनेक कन्नडिगांची कुलदैवतं महाराष्ट्रात आहेत. थोडक्यात दोन राज्यांतील बंध हा मजबूत आहे. तेव्हा खरंतर कर्नाटक सरकारने सामंजस्याची भूमिका घेतली तर संघर्षाची वेळच येणार नाही.

पण कुठल्याही पक्षाचं सरकार तिकडे येऊ दे त्यांच्या वागण्यात यत्किंचितही फरक नसतो. म्हणूनच तिथल्या विधानभवनात मराठी भाषिक आमदार, जो त्या भागातील मराठी अस्मितेचं प्रतिनिधित्व करेल, मराठी माणसांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवेल अशी लोकं असायला हवीत. ह्यासाठी सीमाभागातील लोकांना १० मे ला संधी आहे. मराठी आमदारच निवडून येतील हे तुम्ही पाहायला हवं, हे तुमच्या आणि पर्यायाने मराठी भाषेच्या हिताचं आहे. ही संधी दवडू नका, असे आवाहन राज ठाकरेंनी केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com