Ramdas Athawale : शिंदे-फडणवीसांची जमली जोडी, अडीच वर्ष चालणार सत्तेची गाडी

Ramdas Athawale : शिंदे-फडणवीसांची जमली जोडी, अडीच वर्ष चालणार सत्तेची गाडी

रामदास आठवले यांनी त्यांच्या खास कवितेच्या शैलीतून व्यक्त केला विश्वास

संजय देसाई | सांगली : राज्य सरकार चालणार नाही, असे विरोधक म्हणत असले तरी, आमचं राज्य सरकार फक्त अडीच वर्षं नाही तर पुढील दहा वर्षे चालणार, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी शिंदे आणि फडणवीस (Shinde-Fadnavis Government) यांची जमलेली आहे जोडी, अडीज वर्ष चालणार आहे सत्तेची गाडी, अशी कविताही केली. सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे डॉ. शंकरराव खरात जन्मशताब्दी साहित्य संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी आठवले हे बोलत होते.

Ramdas Athawale : शिंदे-फडणवीसांची जमली जोडी, अडीच वर्ष चालणार सत्तेची गाडी
शिवसेनेच्या कारवाईवर संतोष बांगर म्हणाले, मी बंडखोरी...

रामदास आठवले म्हणाले की, यापूर्वी महाविकास आघाडी सरकार टिकणार नाही, असे आम्ही म्हणत होतो. आता विरोधक हे युती सरकार चालणार नाही, असे म्हणत आहेत. मात्र, युती सरकार फक्त अडीच वर्षं नाही तर पुढील दहा वर्षे टिकणार आहे, असा दावा त्यांनी केला आहे.

जो पर्यंत नरेंद्र मोदी खंबीरपणे उभे आहेत, तोपर्यंत आम्हाला कोणतीही चिंता नाही, असे सांगून आठवले पुढे म्हणाले, शिंदे आणि फडणवीस यांची जमलेली आहे जोडी, अडीच वर्ष चालणार आहे सत्तेची गाडी', अशी कविता सुद्धा त्यांच्या शैलीतील कविताही सादर केली. साहित्यिक आणि कादंबरीकार डॉ. शंकरराव खरात यांच्या स्मारकासाठी 40 कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, अशी माहितीही केंद्रीय रामदास आठवले यांनी दिली.

Ramdas Athawale : शिंदे-फडणवीसांची जमली जोडी, अडीच वर्ष चालणार सत्तेची गाडी
ED Summons Sonia Gandhi : सोनिया गांधींच्या अडचणीत वाढ, ईडीने पुन्हा बजावले समन्स

शिवसेनेच्या बंडखोर 16 अमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तातडीने निर्णय द्यावा. यासाठी शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळली असून 16 अमदारांवर पुढील सुनावणी होईपर्यंत कारवाई करण्यास मनाई केली आहे. पुढील सुनावणी ही सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर होणार आहे. सर्वोच्च न्यायलायाचा हा निर्णय शिवसेनेच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला दिलासा देणारा निर्णय आहे. तर, सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर ही एकनाथ शिंदे गटाचा विजय निश्चित होईल. लोकशाहीत बहुमताचा निर्णय हाच न्यायसंगत असतो त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या 16 आमदारांना जरूर न्याय मिळेल, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com