काका-काका बोलून पाठीत खंजीर खुपसला; रामदास कदमांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल

काका-काका बोलून पाठीत खंजीर खुपसला; रामदास कदमांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल

रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर जोरदार घणाघात केला आहे. तसेच, मराठा आरक्षणावरही प्रतिक्रिया दिली आहे.

चिपळूण : माझी आमदारकी काढून आदित्य ठाकरेंना मंत्रीपद दिलं. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघेही गद्दार आहेत, असा घणाघात रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर केला आहे. त्याने काका काका बोलून माझ्या पाठीत खंजीर खुपसले आहे. त्यामुळे तो गद्दार आहे, अशीही टीका त्यांनी केली आहे.

काका-काका बोलून पाठीत खंजीर खुपसला; रामदास कदमांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल
तू सासरची भाकरी खातोस ना तर गप्प खा; भुजबळांची जरांगेंवर हल्लाबोल, कुणबींच्या नावाखाली...

शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांनी सर्वांना जीव लावून सेना मोठी केली. पण, आदित्य याला वाटते की सेना त्यांनी स्थापन केली. आणि हे बाप-लेक स्वतःची कंपनी असल्यासारखे वागत असून हाताखालचे लोक आमचे नोकर असल्याचे त्यांना वाटत आहे. त्यामुळे त्यांची औकात नसल्याचे म्हणत रामदास कदम यांनी उद्धव व आदित्य ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाबद्दल बोलताना रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या गोष्टी आपल्या हातात नाही, सुप्रीम कोर्ट आपल्या हातात नाही. न्यायाधीश तुमच्या आमच्या हातात नाही हे प्रत्येकाला समजले पाहिजे ही न्यायालयीन प्रक्रिया आहे. जे महाराष्ट्र सरकारच्या हातात ते त्यांनी केले आहे. कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यामुळे कोणावर तरी विश्वास ठेवला पाहिजे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देणार नाही, असे स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे मग भुजबळ यांनी थांबले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com