'आव्हाडांनी औरंगजेबाचे मंदिर उभारावे अन् उदघाटनाला अजित पवार, उद्धव ठाकरेंना बोलवावे'

'आव्हाडांनी औरंगजेबाचे मंदिर उभारावे अन् उदघाटनाला अजित पवार, उद्धव ठाकरेंना बोलवावे'

जितेंद्र आव्हाड यांच्या विधानावरुन आता राजकीय वातावरण तापले असून नरेश म्हस्के यांनी टीकास्त्र सोडले आहे.

मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवारांची पाठराखण करताना जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब क्रूर नसल्याचे म्हंटले होते. यावरुन आता राजकीय वातावरण तापले असून शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आव्हाडांवर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी आता औरंगजेबाचं मंदिर उभारावं आणि उदघाटनाला अजित पवार, संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना बोलवावे, असा टोला म्हस्के यांनी जितेंद्र आव्हाडांना लगावला आहे.

'आव्हाडांनी औरंगजेबाचे मंदिर उभारावे अन् उदघाटनाला अजित पवार, उद्धव ठाकरेंना बोलवावे'
धर्मवीर पदवी न लावण्याची संभाजीराजेंची भूमिका; इंद्रजीत सावंतांचा मोठा दावा

नरेंद्र म्हस्के म्हणाले की, जितेंद्र आव्हाड हे कायमच आपल्या सोयीने इतिहास मांडतात. औरंगजेबाला क्रूरच होता. त्यामुळेच संभाजीराजेंचे अतोनात हाल करत त्यांची हत्या केली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून कायमच हिंदू धर्माचा अपमान केला जातो. छत्रपती संभाजी महाराजांनी मुस्लिम धर्म स्वीकारला नाही त्याऐवजी आपल्या प्राणांची आहुती दिली. मग त्यांना धर्मवीर का म्हणायचं नाही? जितेंद्र आव्हाडांनी आता औरंगजेबाचं एक मंदिर बनवावं आणि उद्घाटन करायला अजित पवार, संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना बोलवावं, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला आहे.

'आव्हाडांनी औरंगजेबाचे मंदिर उभारावे अन् उदघाटनाला अजित पवार, उद्धव ठाकरेंना बोलवावे'
अजित पवार दिलगिरी व्यक्त करत नाहीत, तोपर्यंत... : चंद्रकांत पाटील

काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?

संभाजी महाराजांचे डोळे फोडले त्याठिकाणी विष्णूचे मंदिर होते. ते औरंगजेबाने तोडलं नाही, तो क्रूर असता तर त्याने विष्णूचं मंदिर तोडलं असते, असे आव्हांनी म्हंटले होते. विधाना चुकीचे असल्याचे लक्षात येताच जितेंद्र आव्हाडांनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन सारवासारव केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com