महाविकास आघाडीच्या काळातच राजकारण मुद्द्यावरून गुद्द्यांवर; मुनगंटीवार टीका

महाविकास आघाडीच्या काळातच राजकारण मुद्द्यावरून गुद्द्यांवर; मुनगंटीवार टीका

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कटुता संपवण्याच्या वक्तव्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्वागत केले.

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कटुता संपवण्याच्या वक्तव्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्वागत केले. यावर राजकीय वर्तुळातून उलट-सुलट प्रतिक्रिया येत आहे. अशातच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मागील अडीच वर्षात राजकारण मुद्द्यावरून गुद्दयावर गेले, असा टोला संजय राऊतांना लगावला आहे.

महाविकास आघाडीच्या काळातच राजकारण मुद्द्यावरून गुद्द्यांवर; मुनगंटीवार टीका
राज्याचे नेतृत्व फडणवीसांकडे; राऊतांकडून फडणवीसांचे कौतुक,म्हणाले कटुता संपवायचीये

शिवप्रताप दिनीच जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने मोठी कारवाई करत प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखान कबरीजवळील अतिक्रमण पाडले आहे. याविषयी बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला. तो दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा करण्यात येतो. माँ जिजाऊंनी अफजलखानाचे डोकं पुरायला सांगितले. २९ जुलै १९५३ रोजी एक संस्था स्थापन केली. अफजलखानाचे उदात्तीकरण करण्याचे काम संस्थेने केले. संस्थेने काही अतिक्रमण केली होती. वन विभागाने आज ती काढली. न्यायालयाने काही सूचना व आदेश केले होते. आज शिवप्रताप दिनी अतिक्रमण काढण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी झाली. मागील सरकारमध्ये ५ मे २००८ रोजी या समाधीला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोपही त्यांनी केला.

महाविकास आघाडीच्या काळातच राजकारण मुद्द्यावरून गुद्द्यांवर; मुनगंटीवार टीका
मुख्यमंत्र्यांच्या लास्ट वॉर्निंगनंतर अब्दुल सत्तार अलर्ट मोडवर; म्हणाले, अधिकच बोललो तर...

अनेक उदाहरणे राज्याने पाहिली आहेत. मुंडेंविरोधात विलासराव देशमुखांची चर्चा व मैत्री आपण पाहिली आहे. गेल्या अडीच वर्षात राजकारण मुद्द्यावरून गुद्दयावर गेले. टोपण नाव विकसित केली. मोठे नेते काही शब्द वापरायचे. देवेंद्र फडणवीसांनी एक मुद्दा पुढे ठेवला, सामनाने त्याची री ओढली. राऊत यांनी तोच मुद्दा घेतला, त्याचे स्वागत आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंनी भुजबळांना जवळ बसवले. ज्यांनी बाळासाहेबांना अटक केली. आयुष्यात भुजबळ यांना संपर्क होऊन देणार नाही, असे बाळासाहेब म्हटले होते. मात्र मुलाला ते सांगायचे विसरले, असा टोला त्यांनी लगावला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com