कंगना राणावत हिच्या पुतळ्याला शिवसैनिकांनी मारले जोडे; पोलिसांनी पुतळा घेतला ताब्यात

कंगना राणावत हिच्या पुतळ्याला शिवसैनिकांनी मारले जोडे; पोलिसांनी पुतळा घेतला ताब्यात

Published by :
Published on

भारताला 1947ला भीक मिळाली होती खरं स्वातंत्र्य तर 2014 ला मिळाले. असं वादग्रस्त वक्तव्य बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने केल्यानंतर तीच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. याचा निषेध करण्यासाठी सातारा शहर शिवसेनेच्या वतीने पोवई नाक्यावर कंगना राणावत हिच्या पुतळ्याला "जोडे मारो" आंदोलन करण्यात आले.

दरम्यान पुतळ्याला जोडे मारण्याच्या आधीच पोलिसांनी शिवसेनेच्या आंदोलकांना रोखत पुतळा ताब्यात घेतल्याने शिवसैनिकांच्या आंदोलनाची हवा निघून गेली. यावेळी उपस्थित संतप्त शिवसैनिकांनी कंगना राणावत हीच्याविरोधात तीव्र घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com