Maharashtra Election Results 2026 : मुंबईत सत्ता कुणाच्या हाती? मातोश्री की देवाभाऊ, पाहा महानिकाल फक्त लोकशाही मराठीवर...
राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी काल मतदान पार पडले असून आज निकालाचा दिवस आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार असल्याने सर्वांचे लक्ष निकालांकडे लागले आहे.
मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी भाजप तसेच निवडणूक यंत्रणेवर टीकेची झोड उठवली होती. यानंतर निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. बोटावर लावलेली शाई सहज निघत नसून लगेच पुसल्यासच ती कमी होते, असे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले. सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडीओंची चौकशी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल, असेही आयोगाने सांगितले.
काही ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड आणि मतदान केंद्रांवर किरकोळ वाद झाल्याच्या तक्रारी आल्या, मात्र बहुतांश ठिकाणी मतदान सुरळीत झाले. आता काही तासांतच 29 महापालिकांचे निकाल समोर येणार आहेत. कोणता पक्ष आघाडीवर राहतो, याबाबत जनतेत प्रचंड उत्सुकता आहे. सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार केला होता. अखेर मतदारांनी कोणाला पसंती दिली, हे आज सायंकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे.
थोडक्यात
• मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि निवडणूक यंत्रणेवर टीका केली.
• निवडणूक आयोगाने तत्काळ पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली.
• आयोगाचे स्पष्टिकरण: बोटावर लावलेली शाई सहज निघत नसते; लगेच पुसल्यास कमी होते.
• सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडीओंची चौकशी केली जाईल.
• आवश्यक ती कारवाई निवडणूक आयोगाद्वारे केली जाईल.

