राज्यात पुन्हा अवकाळीचा कहर पाहायला मिळत आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळीचा फटका बसलत आहे. यामुळे शेतपीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी संकटात सापडला आहे.
काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. तर काही ठिकाणी गारपीट झाली आहे. या पावसाचा शेती पिकांना मात्र फटका बसत आहे. राज्यातील शेतकरी संकटात आहे. राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.