Maharashtra Rain : पावसाचा जोर कायम; कुठे आहे रेड अलर्ट?

Maharashtra Rain : पावसाचा जोर कायम; कुठे आहे रेड अलर्ट?

राज्यात पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

राज्यात पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. नद्या नाल्यांना पूर आला आहे. राज्यात जोरदार पाऊस सुरु असल्यामुळे पावसाने सरासरी गाठली आहे. आतापर्यंत १०४ टक्के पाऊस झाला आहे.हवामान विभागाने शुक्रवारी पुन्हा मुंबईला रेड अलर्ट दिला आहे.

ठाणे जिल्ह्याला रेड अलर्ट दिल्याने कल्याण डोंबिवली परिसरातील सर्व शाळांना पालिकेकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतील वाढ होत आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे ठाणे आणि पालघरमधील शाळांना सुटी जाहीर केली गेली आहे.पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. आजही दिवसभर मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com