Operation Sindoor : ....निर्णय घेण्याचा संपूर्ण अधिकार सरकारला आहे, पाकवरील हवाई हल्ल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

Operation Sindoor : ....निर्णय घेण्याचा संपूर्ण अधिकार सरकारला आहे, पाकवरील हवाई हल्ल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

सिंदूर मोहिम: पाकवरील हवाई हल्ल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी सरकारला पूर्ण पाठिंबा दर्शवला, भारतीय सैन्य दलाच्या शौर्याचे कौतुक.
Published by :
Team Lokshahi
Published on

22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवादांनी भारतीय पर्यटकांवर हल्ला केला. त्यांना धर्म विचारुन त्याच्यावर दहशतवादी हल्ला केला होता. याचपार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानवर बदला घेत 'Operation Sindoor'ची मोहिम केली. या मोहिमेमध्ये भारताने रात्री 1.30 च्या सुमारास पाकिस्तानच्या वेगवेगळ्या ठिकाणावर हल्ला केला. याचपार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी कौतुक करत पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे.

सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले की, ही कारवाई दहशतवाद्यांच्या विरोधात होती. यात कोणत्याही निर्दोष नागरिकांना इजा पोहोचलेली नाही. “भारतीय हवाई दलाने अत्यंत अचूकतेने व संयमाने ही कारवाई केली असून शांततेच्या मार्गाचा स्वीकार करत, गांधीजींच्या विचारांनुसार, ही कारवाई केवळ दहशतवाद संपवण्यासाठी करण्यात आली आहे,” असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की,“पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा हा एक प्रकारचा प्रयत्न आहे. सरकारने या मिशनला 'सिंदूर मिशन' असे नाव दिले असून, निर्णय घेण्याचा संपूर्ण अधिकार सरकारला आहे.” सुप्रिया सुळे यांनी भारतीय सैन्यदल, वायूसेना आणि नौदलाच्या शौर्याचे कौतुक करत त्यांचे आभार मानले.

पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या “हे सैन्य दल आपल्या देशवासीयांच्या सुरक्षेसाठी आपले जीवन अर्पण करत आहेत. केंद्र सरकार दहशतवादविरोधात जे निर्णय घेत आहे. त्यांना आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. कारण राष्ट्रहित सर्वात श्रेष्ठ आहे, हा मुद्दा अत्यंत संवेदनशील असून राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी वक्तव्य करताना विशेष काळजी घ्यावी. प्रत्येक स्टेटमेंट हे देशाच्या अभिमानाचे आणि शौर्याचे असावे, याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी. पक्ष वेगळे असले तरी आम्ही सर्व प्रथम भारतीय आहोत. राष्ट्रहितासाठी आम्ही नेहमी भारत सरकारसोबत आहोत.” तसेच त्यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचेही मन:पूर्वक आभार मानले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com