मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा; रात्रीपासून जोरदार पाऊस

मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा; रात्रीपासून जोरदार पाऊस

मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. मुंबईत रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. रात्रीपासून पावसाने मुंबई शहर आणि उपनगरात हजेरी लावली आहे.

काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती आता मुंबईत पुढील दोन ते तीन दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहिलं अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मुंबईतील विविध भागात पावसाची हजेरी लावल्यामुळे आता मुंबईकरांची उकाड्यापासून काहीशी सुटका झाली असून काही भागात पाणी देखील साचलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com