मुंबईत पाण्याचा प्रश्न गंभीर; मुंबईकरांसाठी राखीव पाणीसाठ्याचा वापर सुरु

मुंबईत पाण्याचा प्रश्न गंभीर; मुंबईकरांसाठी राखीव पाणीसाठ्याचा वापर सुरु

मुंबईत पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला पाहायला मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मुंबईत पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला पाहायला मिळत आहे. मुंबईकरांसाठी राखीव पाणीसाठ्याचा वापर सुरु करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मोसमी पावसाला सुरुवात झाली असली तरी मात्र धरणक्षेत्रात जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे.

धरणांतील पाणीसाठा 5.33 टक्क्यांच्या आसपास आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणी साठा वेगाने कमी झाला आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

त्यामुळे आता राज्य सरकारने भातसा आणि उर्ध्व वैतरणा धरणांतील राखीव साठा वापरण्यास परवानगी दिल्याची माहिती मिळत आहे. पाणी जपूण वापरण्याचं महापालिकेचं आवाहन केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com