मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! मुंबईत आजपासून 10 टक्के पाणीकपात

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! मुंबईत आजपासून 10 टक्के पाणीकपात

मुंबईत आज, सोमवारपासून 2 डिसेंबरपर्यंत 10 टक्के पाणीकपात करण्यात आले आहे. या कालावधीत नागरिकांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.
Published by  :
Team Lokshahi

मुंबईत आज, सोमवारपासून 2 डिसेंबरपर्यंत 10 टक्के पाणीकपात करण्यात आले आहे. या कालावधीत नागरिकांना पाणी जपून वापरावे लागणार आहे. बृहन्मुंबई महापालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील ‘न्यूमॅटिक गेट सिस्टीम’मधील दुरुस्तीचे काम मुंबई महापालिकेने हाती घेतले आहे. तातडीच्या दुरुस्ती कामामुळे 20 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत मुंबई महानगरात तसेच बृहन्मुंबई महापालिकेतर्फे ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यात 10 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.

संपूर्ण मुंबईत आजपासून 10 टक्के पाणी कपात केली जाणार आहे. सोमवार दिनांक 20 नोव्हेंबर ते शनिवार दिनांक 2 डिसेंबर असे तेरा दिवस ही पाणी कपात असेल. त्यामुळे ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार असून या कालावधीत नागरिकांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com