Nana Patole : 'उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाचे स्वागत करु'
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त काल मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यातून बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेसाठी स्वबळाचे संकेत दिलेत.
उद्धव ठाकरे म्हणाले की, काही काळामध्ये महापालिका निवडणुका येणार आहेत. मी सगळ्यांशी बोलतो आहे. सगळ्यांचे मत आहे की एकटे लढा. अजून निवडणूक जाहीर झालेली नाही. पण मला तुमची जिद्द बघू द्या, तुमची तयारी बघू द्या. ज्या भ्रमात आपण राहिलो. त्या भ्रमातून पहिलं बाहेर या. ज्या क्षणी माझी खात्री पटेल आपली तयारी झाली. मी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही सगळे शपथ घेऊन सांगत असाल तर जेव्हा वेळ येईल तेव्हा मी एकटा लढण्याचा निर्णय नक्की घेतल्याशिवाय राहणार नाही. असे उद्धव ठाकरे म्हणाले.
याच पार्श्वभूमीवर आता नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले म्हणाले की, त्यांच्या निर्णयाचे स्वागत करु. जेव्हा एका पक्षाचे नेते त्या पद्धतीचे बोलतात तेव्हा त्यांच्या निर्णयाचे स्वागतच केलं पाहिजे. प्रत्येक पक्षाला आपले धोरण राबवण्याचा अधिकार आहे. सर्वांना सोबत घेऊन चालणं ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाची भूमिका काय आहे ते मांडत आहेत. असे नाना पटोले म्हणाले.