Operation Sindoor : भारतीय लष्कराला मोठं यश; लष्कर - ए - तोयबाच्या दोन कमांडरचा खात्मा
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात हा हल्ला करण्यात आला. जम्मू काश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली.
याच पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय सैन्यदलानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 ठिकाणांवर एअर स्ट्राइक केला आहे. भारताविरोधात दहशतवादी हल्ला ज्या ठिकाणी करण्याची योजना तयार करण्यात आली त्या 9 ठिकाणांवर हल्ले करण्यात आले.
या हल्ल्यात लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या या दोन्हीही दहशतवादी मुख्यालयांवर कारवाई करण्यात आली. या हल्ल्यात 100 हून अधिक दहशतवादी मारले गेल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये लष्कर ए तोयबाचे दोन कमांडर ठार झाले असून मुदस्सीर आणि हाफीज अब्दुल मलिक अशी त्या दोन दहशतवाद्यांची नावे आहेत.