ताज्या बातम्या
Firing at LOC : पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर गोळीबार; भारताच चोख प्रत्युत्तर
भारतीय सैन्याकडूनही पाकिस्तानच्या या नापाक हरकतीला जशास तस प्रत्युत्तर देण्यात येत आहे.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. दोन्ही देशांमधील वातावरण तापले असतानाच नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने कुरापती करण्यास सुरूवात केली आहे. पाकिस्तानने सीमारेषेवर गोळीबार सुरू केला असून भारतीय सैनिकही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत आहेत.
जम्मू-काश्मीरच्या आकाशात फायटर जेट्स उड्डाण करताना दिसत आहेत. एलओसीवर पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार सुरु होता. पाकिस्तानच्या या नापाक हरकतीला भारतीय सैन्याकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. नियंत्रण रेषेवर असलेल्या पाकिस्तानी सैन्याच्या चौक्यांकडून हा गोळीबार सुरु आहे. या गोळीबारात भारताच्या बाजूला काहीही नुकसान झालेलं नाही.