नवं संसद भवन लोकशाहीचं नवं मंदिर; पंतप्रधान मोदींचं वक्तव्य

नवं संसद भवन लोकशाहीचं नवं मंदिर; पंतप्रधान मोदींचं वक्तव्य

पंतप्रधान मोदींनी आज नवीन संसद भवनाचे उद्घाटन झाले.

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींनी आज नवीन संसद भवनाचे उद्घाटन झाले. तामिळनाडूच्या अध्यानम संतांनी संपूर्ण विधीपूर्वक विधी पार पाडला. धार्मिक विधीनंतर अधिनस्थ संतांनी सेंगोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनात स्थापित केले. यानंतर त्यांनी सभागृहाला संबोधित केले आहे.

स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्ताने देश अमृत महोत्सव साजरा करत आहे. आज सकाळीच संसदेच्या संकुलात सर्वधर्मीय प्रार्थना आयोजित करण्यात आली आहे. भारतीय लोकशाहीच्या या सुवर्ण क्षणासाठी मी सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो. ही केवळ एक इमारत नाही, तर ती 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब आहे. जगाला भारताच्या निर्धाराचा संदेश देणारे हे आपल्या लोकशाहीचे मंदिर आहे, असे मोदींनी म्हंटले आहे.

नवं संसद भवन लोकशाहीचं नवं मंदिर; पंतप्रधान मोदींचं वक्तव्य
पंतप्रधान मोदी संसदेच्या उदघाटनाला राज्याभिषेक समजताहेत; राहुल गांधींचा निशाणा

नवीन विक्रम हे नवीन मार्गांवर चालल्यानेच निर्माण होतात. नवा भारत नवीन उद्दिष्टे ठरवत आहे. नवा उत्साह आहे, नवा प्रवास आहे. नवा विचार, नवी दिशा, नवी दृष्टी. संकल्प नवीन आहे, विश्वास नवीन आहे. आमचे संविधान हाच आमचा संकल्प असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. जो थांबतो, त्याचे नशीबही थांबते. जो चालत राहतो, त्याचे नशीबही चालत असते. म्हणूनच चालणे सुरु ठेवा. गुलामगिरीनंतर आपल्या भारताने खूप काही गमावून आपला नवा प्रवास सुरू केला. तो प्रवास अनेक चढउतारांवरून, अनेक आव्हानांवर मात करत स्वातंत्र्याच्या सुवर्णकाळात प्रवेश केला आहे.

संसदेची नवी इमारत या प्रयत्नांचे जिवंत प्रतीक बनली आहे. आज नवीन संसद भवन पाहून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो. या वास्तूमध्ये वारसा, वास्तुकला, कला आणि कौशल्य आहे. यामध्ये संस्कृती तसेच संविधानाचा आवाज आहे. भारत हा केवळ लोकशाहीचा सर्वात मोठा देश नाही. उलट ती लोकशाहीची माताही आहे. जागतिक लोकशाहीचाही तो पाया आहे. लोकशाही हा आपला 'संस्कार', विचार आणि परंपरा आहे, असेही मोदी यांनी सांगितले.

यावेळी पंतप्रधान मोदींनी आपल्या नऊ वर्षांच्या सरकारचे रिपोर्ट कार्डही सादर केले. एखाद्या तज्ज्ञाने गेल्या नऊ वर्षांचे मूल्यमापन केले तर ही नऊ वर्षे भारतातील नवनिर्माणाची असल्याचे लक्षात येईल. गरिबांचे कल्याण झाले आहे. आज संसदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा आम्हाला अभिमान वाटतो. तर, गेल्या नऊ वर्षांत बांधलेल्या 11 कोटी स्वच्छतागृहांमुळे मीही समाधानी आहे. मागील नऊ वर्षांत गावांना जोडण्यासाठी चार लाख किलोमीटरहून अधिक रस्ते बांधण्यात आले.

आज इको फ्रेंडली इमारत पाहून आनंद होत आहे, पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी आम्ही ५० हजारांहून अधिक अमृत सरोवर बांधले आहेत. आज आपण नवीन संसद भवन बांधल्याचा आनंद साजरा करत असताना देशात ३०,००० हून अधिक नवीन पंचायत इमारती बांधल्या आहेत. म्हणजेच पंचायत भवनापासून संसद भवनापर्यंत आमची निष्ठा एकच आहे. आमची प्रेरणा तीच आहे. देशाचा विकास, देशातील लोकांचा विकास, असे पंतप्रधान मोदींनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com