Prakash Ambedkar
Prakash AmbedkarPrakash Ambedkar

मोठी बातमी! महापालिका निवडणूक शेवटचीच ठरणार? बड्या नेत्याच्या दाव्याने राज्यात खळबळ

Prakash Ambedkar : अकोल्यातील एका सभेत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि काँग्रेसवर जोरदार शब्दांत टीका केली.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Prakash Ambedkar : अकोल्यातील एका सभेत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि काँग्रेसवर जोरदार शब्दांत टीका केली. त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

आंबेडकर म्हणाले की, काँग्रेस छोटे-मोठे गैरप्रकार करणारी आहे, तर भाजप मात्र मोठ्या प्रमाणात लूट करणारी शक्ती आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, भाजप सत्तेत राहिली तर सर्व काही उध्वस्त होईल. त्यामुळे मतदारांनी या निवडणुकीत भाजपला रोखण्याची गरज आहे.

सरकारवर टीका करताना त्यांनी राज्यात सत्तेच्या जोरावर दहशत सुरू असल्याचा आरोप केला. तसेच मतदारसंघांची रचना मुद्दाम बदलण्यात आल्याचेही ते म्हणाले. काही पक्षांची युती जनतेला मान्य नसल्याचाही त्यांनी उल्लेख केला.

शेवटी त्यांनी नागरिकांना आवाहन करत सांगितले की, लोकशाही वाचवायची असेल तर या निवडणुकीत ठाम भूमिका घ्यावी लागेल. जनता जागी झाली, तरच सत्तेचा गैरवापर थांबेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com