Gunratan Sadavarte On Thackeray Bandhu : "राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं राजकारण दळभद्री..", गुणरत्न सदावर्तेंचा घणाघात
Gunratan Sadavarte Statement : आजपासून विधानसभाचे पावसाळी अधिवेशाला सुरुवात होणार आहे. यासाठी विरोधकांना राज्य सरकारने चहापाण्याला बोलवले असता त्यांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला. काल महायुती सरकारने पत्रकार परिषद घेऊन हिंदी सक्तीच्या जीआरवर रद्द केला. त्यानंतर राजकीय वर्तृळावर पडसाद उमटताना दिसत आहेत. याचपार्श्वभूमीवर ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी ते म्हणाले की, "सामन्य मुलांचे शिक्षण थांबवण्यासाठी जो घाट घातला. जेव्हा राजकरणासाठी मास्टरमाइंट दोघेजण बनले आहेत. या शैक्षणिक हत्त्येवर ज्या प्रकारे विजय मेळावा तयार करायला चाललं आहेत, तो त्यांचा विजय मेळावा नाही आहे. तो शिक्षण हत्त्येचा तांडव आहे. ठाकरेबंधूनी जे काही कुभांड रचलं ते निवडणुका तोंडावर लोकसभेच्या निवडणुकीवर मी बोलो होतो की, संविधान खतरे मैं है, त्याचप्रमाणे मी पुन्हा सांगतो भाषा खतरेमध्ये आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे राजकारण दळभद्री आहे, सरकारने घेतलेली भूमिका सिम्पलीसिटीमध्ये एक की आहे."