Sanjay Raut : धनंजय मुंडेंच्या राजकीय पुनर्वसनाच्या चर्चांवर , राऊतांचा मोठा खुलासा

Sanjay Raut : धनंजय मुंडेंच्या राजकीय पुनर्वसनाच्या चर्चांवर , राऊतांचा मोठा खुलासा

आम्ही चुकलो तर कान धरा, पण आम्हाला आता रिकामं ठेवू नका. आम्हाला जबाबदारी द्या, धनंजय मुंडे असे म्हणाले होते. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आता यावर मोठा खुलासा केला आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

थोडक्यात

  • धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळणार की नाही ?

  • राऊतांचा धनंजय मुंडेंबाबत मोठा गौप्यस्फोट

  • मुंडे यांना शाहांच्या आदेशामुळे मंत्रिपदापासून दूर केलं

प्रकृतीच्या कारणास्तव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांना पुन्हा मंत्रिपद यानंतर आता गेल्या काही दिवसांपासून मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या राजकीय वर्तुळात यावरुन जोरदार चर्चा सुरु आहे. त्यातच खासदार सुनील तटकरेंकडे आता धनंजय मुंडे यांनी एक भावनिक आवाहन केले होते. आम्ही चुकलो तर कान धरा, पण आम्हाला आता रिकामं ठेवू नका. आम्हाला जबाबदारी द्या, धनंजय मुंडे असे म्हणाले होते. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आता यावर मोठा खुलासा केला आहे. नुकतंच प्रसारमाध्यमांशी संजय राऊत यांनी संवाद साधला. धनंजय मुंडेंच्या मंत्रि‍पदावर यावेळी त्यांनी भाष्य केले. धनंजय मुंडे यांना अमित शाहांच्या आदेशामुळे मंत्रिपदापासून दूर केलं आहे. त्यात अजित पवारांची फार काही भूमिका असं मला वाटत नाही. हे सर्व अमित शाह ठरवतात, असे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत काय म्हणाले?

धनंजय मुंडे यांच्यावरील आक्षेप विशिष्ट प्रकरणात आहे. पण तो त्यांच्या पक्षातील अंतर्गत विषय आहे की पक्षाने त्यांना काय काम दिलं पाहिजे. हा त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी याबद्दलचा निर्णय घ्यायचा आहे. कोणताही राजकीय कार्यकर्ता कधीच रिकामी राहत नाही. तो स्वत:च काम काढतच असतो. अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे मूळ मालक दिल्लीत बसले आहेत. दिल्लीच्या मालकांच्या आदेशामुळे म्हणजेच अमित शाहांच्या आदेशामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदापासून दूर केलं आहे. त्यात अजित पवारांची फार काही भूमिका असं मला वाटत नाही. हे सर्व अमित शाह ठरवतात. कारण त्यांच्या पक्षाचे प्रमुख दिल्लीत अमित शाह आहेत. त्यामुळे मुंडे यांचं काय करायचे हे दिल्लीतून ठरेल, असे संजय राऊत यांनी सांगितले.

धनंजय मुंडे काय म्हणाले ?

रायगडमध्ये जाहीर सत्कार सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते आणि खासदार सुनील तटकरे यांचा पार पडला. या सोहळ्यात बोलताना धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी सुनील तटकरे यांच्याकडे एक भावनिक विनंती केली. मी आज जे काही आहे, ते सुनील तटकरे यांच्यामुळेच आहे. माझ्या राजकीय प्रवासात वडील नसताना त्यांनी मला मोठा आधार दिला. राजकारणात माझे वडील नाहीत, पण त्यांच्या जागेवर मला सुनील तटकरे यांचा आधार मिळाला. त्यांनी अनेक वर्षांपासून देशातील आणि राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांसोबत घनिष्ठ संबंध जपले आहेत. महाराष्ट्राच्या मातीत नेमकं काय चाललं आहे, याची त्यांना अचूक जाण आहे. हा पुरस्कार त्यामुळेच त्यांना मिळाला आहे.” असे धनंजय मुंडे म्हणाले होते. आपल्या भाषणाच्या अखेरीस त्यांनी तटकरे यांच्याकडे “माझ्या हाताला आता काहीतरी काम द्या. कायम आम्हाला मार्गदर्शन करत राहा. आम्ही चुकलो तर कान धरा, पण आता आम्हाला रिकामं ठेवू नका. आम्हाला जबाबदारी द्या.” अशी मागणी केली होती.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com