Sanjay Raut : 'सावरकरांचे विचार न मानणाऱ्या अजित पवारांना दूर करा'.. खासदार संजय राऊतांची मागणी

Sanjay Raut : 'सावरकरांचे विचार न मानणाऱ्या अजित पवारांना दूर करा'.. खासदार संजय राऊतांची मागणी

आज खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, “काल प्रथमच आपण पाहिलं की संयुक्त मुलाखतीला सर्व पत्रकारांना बसवलं होतं.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

आज खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, “काल प्रथमच आपण पाहिलं की संयुक्त मुलाखतीला सर्व पत्रकारांना बसवलं होतं. दोन धुरंधर एकत्र आले – मुलाखत देणारे आणि घेणारे, आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने ही मुलाखत झाली. महाराष्ट्राला जे प्रश्न आहेत, त्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट मत व्यक्त केले. खणखणीतपणे त्यांनी महाराष्ट्राच्या समस्या मांडल्या.”

राऊत यांनी भाजपवर निशाणा साधत म्हटले, “भाजपने निवडणूक आयोग, प्रशासन आणि न्यायव्यवस्थेत नेमलेले अधिकारी सर्व मराठी आहेत. मराठी माणसाच्या हातून मराठी माणसाचं डेथ वॉरंट काढलं जात आहे. हे भाजपच कसब आहे.”

सदर पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही सवाल उपस्थित केला. राऊत म्हणाले, “राज्य वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फिरत आहेत, भाजपला शिव्या देत असूनही ते सरकारमध्ये आहेत. काल त्यांना सावरकरांवर मुख्यमंत्र्यांनी ज्ञान दिलं, पण जर ते सावरकर विरोधी आहेत, तर त्यांना सरकारमध्ये का ठेवता?” राऊत यांनी भाजपच्या स्थानिक राजकारणावरही टीका केली. “मीरा-भाईंदरमध्ये भाजपने एमआयएमला पाठिंबा दिला आहे, अंबरनाथमध्ये काँग्रेस-भाजप युती झाली. आत हिरवे नाही का झाले? दुतोंडी गांडूळ अशा पद्धतीने भाजपचे राजकारण चालू आहे.”

त्यांनी एमआयएमसोबत भाजपच्या युतीवरही भाष्य केले. “मुस्लिम मतांसाठी भाजपने एमआयएमचा थेट पाठिंबा घेतला आहे. अकोटपासून मीरा-भाईंदरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात भाजप-एमआयएम छुपी युती आहे. काही ठिकाणी हे उघड आहे.” पत्रकारांच्या प्रश्नावर, त्यांनी काँग्रेसच्या सहभागावरूनही टीका करत म्हटले, “महाराष्ट्रात अर्धी काँग्रेस भाजपात सहभागी करून घेतली, उर्वरित ठिकाणी एमआयएमसोबत युती केली. जो पेजेला देईल त्याच्या शेजेवर चढायला भाजप तयार आहे. भारत काँग्रेस मुक्त करायचा हा त्यांचा उद्देश होता.” राऊतांच्या या विधानांनी राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून, पुढील राजकीय हालचालींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com