Rohit Pawar : ही लढाई मुख्यमंत्रीपदाची नाही, तर सामान्य लोकांच्या हिताचे सरकार या महाराष्ट्रामध्ये आणण्याची लढाई आहे

Rohit Pawar : ही लढाई मुख्यमंत्रीपदाची नाही, तर सामान्य लोकांच्या हिताचे सरकार या महाराष्ट्रामध्ये आणण्याची लढाई आहे

आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु होत झाले.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु होत झाले. यावेळी माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, महाविकास आघाडी जेव्हा आपण केली. त्यावेळेस कोणालाच माहित नव्हते काय होणार आहे? त्यामुळे आता पवार साहेब राऊत साहेबांशी बोलतील. उद्धव ठाकरे साहेब असतील, काँग्रेसचं नेते त्याठिकाणी बोलतील. त्यामुळे ही लढाई मुख्यमंत्रीपदाची नाही, पण ही लढाई स्वाभिमानाची आहे, सामान्य लोकांच्या हिताचे सरकार या महाराष्ट्रामध्ये आणण्याची लढाई आहे.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार आपल्या या राज्यामध्ये कसं येईल यासाठी सर्व नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि सामान्य जनतेनं प्रयत्न करावे. पदासाठी लढण्यापेक्षा विचारासाठी लढत याच राज्यामध्ये भाजपाला हद्दपार करण्याची खऱ्याअर्थाने वेळ आलेली आहे. असे रोहित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com