Lokshahi Pune Sanwad 2025 : Rupali Chakankar : "राज्यातील आई आता सक्षम व्हावी; तरच..."

Lokshahi Pune Sanwad 2025 : Rupali Chakankar : "राज्यातील आई आता सक्षम व्हावी; तरच..."

'लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे आयोजित 'पुणे संवाद 2025' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
Published by :
Rashmi Mane
Published on

'लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे आयोजित 'पुणे संवाद 2025' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 'पुणे संवाद 2025' या कार्यक्रमात महाराष्ट्राचं राजकारण, सत्ताकारण, समाजकारण, पर्यटन, आरोग्य आदींसह सांस्कृतिक क्षेत्राबद्दलही चर्चा झाली. या कार्यक्रमात रुपाली चाकणकर यांच्यासोबत संवाद साधण्यात आला. यावेळी रुपाली चाकणकर म्हणाल्या की, "प्रत्येक घरातील बाईमधली आई जर जागी झाली, तर आम्हाला महिलांसाठीचा कोणताही वेगळा कायदा करण्याची गरज लागणार नाही. आता आईने सक्षम होण्याची गरज आहे."

लोकशाही मराठीच्या पुणे संवाद २०२५ या चर्चासत्रात महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महिलांसाठीच्या सोयी-सुविधांबाबत जागृत केले. त्या म्हणाल्या की, "लोकांचा आमच्यावर जितका विश्वास नसतो, तितका माध्यमांवर असतो, त्यामुळे लोकशाही मराठी चॅनेलला विनंती आहे की, महिलांसंदर्भातील बातमी जोपर्यंत निकाली लागत नाही. ती प्राधान्याने सुरू ठेवावी. लोकशाहीच्या माध्यमातून मला महाराष्ट्रातील महिला-भगिनींना आवर्जून सांगायचं आहे की, महाराष्ट्र राज्य महिला आयोग हे देशातील पहिलं आयोग आहे की, ज्यांनी टोल फ्री क्रमांक सुरू केला. हा १५५ २०९ टोल फ्री क्रमांक असून या क्रमांकाच्या माध्यमातून गडचिरोलीच्या अहिरे गावातील जी महिला आहे. (हे गाव राज्यातील सीमेच्या शेवटचं गाव म्हणून ओळखलं जात.) ती देखील आमच्या आयोगाशी संपर्क साधू शकते. सोबतच आमचा ईमेल आयडीदेखील उपलब्ध आहे. तिथेही तुम्ही तक्रार नोंदवू शकता. मुंबईच्या कार्यालयामध्ये आणि सहा विभागीय कार्यालयांमध्ये प्रत्येक ठिकाणी, समुपदेशन केंद्रामध्ये आणि वन स्टॉप स्टेशन येथेही महिला तक्रार दाखल करू शकता. तसेच दर आठवड्याला होणार जनता दरबार राज्यातील कानाकोपऱ्यातील महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असतो. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जनसुनावणी घेतो. भरोसा सेलिंग हादेखील पर्याय आहे. तसेच प्रत्येक घरातील बाईमधली आई जर जागी झाली, तर आम्हाला महिलांसाठीचा कोणताही वेगळा कायदा करण्याची गरज लागणार नाही. आता आईने सक्षम होण्याची गरज आहे."

राज्यातील महिलांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून जबाबदारी वाढते. सध्या पुण्यात बरेच बदल होत आहेत. पुण्यातील आव्हान, महिला सुरक्षेचा मुद्दा यावर चर्चा करताना रुपाली चाकणकर म्हणाल्या की, "या कामाच्या निमित्ताने वाड्या-वस्त्या, पाड्यांपर्यंत फिरून आले. जो प्रश्न ठाण्याच्या आहे तो चंद्रपूरचा नसेल, जो पुण्याचा आहे तो मुंबईचा नाही. प्रत्येक ठिकाणची भौगोलिक रचना बदलली की तेथील संस्कृती आणि परंपरेनुसार तेथील प्रश्नही बदलाल. प्रखर्षाने आम्हाला खंत वाटते ती या गोष्टीची की आमचं चांद्रयान चंद्रावर केलं याचा आम्हाला अभिमान आहे. पण त्याचबरोबर आजही आम्हाला बालविवाह, विवधा पुर्नविवाह या प्रथांसाठी कायदे असूनही त्याच्यासाठी आम्हाला ग्रामसभेत ठराव करावा लागेल हे ऐकावं लागंत. किंबहुना त्याच्यासाठी आजही आम्हाला जनजागृती करावी लागते. आजही आमच्या घरामध्ये सात-बाऱ्यावर मुलाचच नाव पाहिजे किंवा दारावरच्या पाटीवर मुलाचच नाव पाहिजे, हा अट्टाहास करणारी पुणेकरांमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. आपण शिकलो, सुशिक्षित झालो, डिगऱ्या घेतल्या पण आमची मानसिकता बदलली का, हा प्रश्न आहे. आमच राहणीमान बदललं पण आमची विचारसरणी बदलली का, हा प्रत्येकाने माणूस म्हणून विचार केला पाहिजे."

"खऱ्या आयुष्यात नागरिक म्हणून जगायला शिकलो का, ह्युमन ट्रॅफिकिंग प्रकरणात काम करताना आढळलं की सर्वाधिक मुली या मुंबई, नागपूर, ठाणे आणि पुण्याच्या आहेत. ग्रामीण भागातू शिक्षणासाठी आलेल्या कष्टकरी घरातील मुली जेव्हा पुण्यात येतात तेव्हा इथल्या संस्कृतीप्रमाणं रहावं, वागावं म्हणून काही मुली-मुलं ही अगदी नशेच्या आहारी जाताना दिसतात. या सगळ्यांमध्ये कुठेतरी संवाद कमी पडतोय. असं वाटतं. आता संवाद साधायचा कोणाशी अशी परिस्थिती असताना मुलं गुगल सर्च करतात. बऱ्याच ठिकाणी मुलांचा संवाद नाही, हे दिसून येत. या अभावी बऱ्याच घटना घडतात. त्यात सायबर क्राइम, मुलींच्या फसवणुकीच्या घटना, ह्युमन ट्राफिकिंगची घटना, प्रेमाच्या जाळ्यात अडकवण, नोकरीच आमिष दाखवणं. याच अनुषंगाने घडणाऱ्या महिला अत्याचाऱ्याच्या घटना आहेत. या सगळ्यात शासन, प्रशासन, कायदा सुव्यवस्था त्यांच काम करत असतं. परंतू त्या पलिकडे जाऊन जेव्हा जन्मदाता बापच मुलीवर बलात्कार करतो. त्यावेळी नात्यांची वीण जाते कुठे. त्यामुळे माणूस म्हणून आपल्याला एकत्र येऊन काम करायला पाहिजे," असेही चाकणकर यांनी नमूद केले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com