मुख्यमंत्री शिंदे हे वाऱ्यावर तर गृहमंत्री फडणवीस नावालाच; सामनातून हल्लाबोल
ठाकरे गटाचा अग्रलेख सामनातून शिंदे - फडणवीस सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे. सामनातून म्हटले आहे की, राज्यात सध्या भडकविल्या जात असलेल्या दंगली राजकीय हेतूने प्रेरित आहेत. त्या जाणीवपूर्वक घडवल्या जात आहेत. काही लोक आगीत तेल वगैरे ओतण्याचे काम करीत आहेत.भाजप हा भ्रष्टाचाऱ्यांना शुद्ध करून घेणारा व दंगली घडविणारा कारखाना आहे. असे सामनातून म्हटले आहे.
तसेच दंगली पेटवून राजकीय भाकऱ्या शेकायच्या हा भाजपचा पिढीजात धंदा आहे व निवडणुका जवळ आल्या की या धंद्यातील गुंतवणुकीत वाढ केली जाते. राज्यात मिंधे सरकार आल्यापासून दंगलींचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रात मिंधे-फडणवीसांचे सरकार आल्यापासून जातीय आणि धार्मिक दंगलींचे प्रमाण वाढले आहे. मुख्यमंत्री शिंदे हे वाऱ्यावर आहेत आणि गृहमंत्री फडणवीस नावालाच आहेत असेच एकंदरीत दिसते. असे म्हणत सामनातून हल्लाबोल करण्यात आला आहे.