ध्यानधारणेवरुन राऊतांचा पंतप्रधान मोदीवर जोरदार निशाणा

ध्यानधारणेवरुन राऊतांचा पंतप्रधान मोदीवर जोरदार निशाणा

देशात लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया काल पार पडली. या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (एनडीए) बाजी मारणार की काँग्रेसला (इंडिया आघाडी) बहुमत मिळणार
Published by :
shweta walge

देशात लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया काल पार पडली. या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (एनडीए) बाजी मारणार की काँग्रेसला (इंडिया आघाडी) बहुमत मिळणार, याचा निकाल अधिकृतरित्या येत्या ४ जूनला जाहीर होणार आहे. यातच काल विविध माध्यमांतून एक्झिट पोल (Exit Poll 2024) जाहीर करण्यात आहे. यात देशात पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूच्या विवेकानंद रॉक मेमोरिअलमध्ये ध्यानधारणा सुरू केली. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

काय म्हणाले संजय राऊत?

एक्झिट पोलमध्ये सगळे मिळून भारतीय जनता पक्षाला 800-900 जागा देतील. कारण मोदींनी एवढे मोठे ध्यान केले आहे. मोदींनी साधना केली, तपस्या केली. त्याप्रमाणे 360 आणि 370 जागा काहीच नाहीत. मोदींसारख्या तपस्वी आणि ध्यानमग्न माणसाला किमान 800 जागा तरी मिळाल्या पाहिजे. तरच ते ध्यान मार्गी लागले, टीका त्यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, अत्यंत फसवणुकीचा हा एक्झिट पोल आहे. गेल्या काही वर्षात ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल चुकीचे ठरत आहेत. भारतीय जनता पक्ष, गृह मंत्रालय आणि यंत्रणा कशा प्रकारे प्रभाव टाकत आहे हे सर्वांना माहिती आहे. काल जयराम रमेश यांनी अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला की, गृहमंत्री अमित शाह यांनी गेल्या 24 तासात किमान 180 जिल्हा न्यायदंडाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून जवळजवळ धमकावले आहे. जर तुम्हाला जिंकण्याची खात्री असेल तर ध्यान तपस्या करून निवडणुका जिंकता येत नाही. धमक्या देऊन निवडणुका जिंकता येणार आहे.

इंडिया आघाडी या देशात सरकार बनवणार आहे. 295 ते 310 हा आमचा लोकांमधून घेतलेला कौल आहे. मला माहीत आहे की महाराष्ट्रात काय होणार आणि देशात काय होणार आहे. कोणी कितीही आकडे लावोत. या देशात एक्झिट पोल बनवणाऱ्या 100 कंपन्या आहेत. एक्झिट पोलवर आमचा विश्वास नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडी 35 प्लस जागा मिळवेल.

गेल्या काही दिवस मी ऐकत होतो की बारामतीमध्ये सुप्रिया सुळे निवडणुकीत परभूत होतील. मात्र त्या किमान दीड लाख मताधिक्याने जिंकतील. शिवसेनेचा 18 जागांचा आकडा कायम राहणार आहे. काँग्रेसचा सर्वोत्तम कामगिरी राहणार आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडी 35 ते 40 जिंकेल. बिहारमध्ये आरजेडी 18 जागा जिंकणार आहे. माझा अंधश्रद्धेवर विश्वास नाही. मला तपस्येतून जो आकडा दिसेल तो सांगावा लागेल. आम्ही किमान 30 ते 35 जागा जिंकत आहोत. त्यासाठी एक्झिट पोलची गरज नाही. आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत, असेही त्यांनी यावेळी म्हटले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com