Sanjay Raut : या देशात आपल्याला हुकूमशाहीविरोधात लढताना काही गोष्टी स्विकाराव्या लागतात, काही गोष्टींचा त्याग करावा लागतो

Sanjay Raut : या देशात आपल्याला हुकूमशाहीविरोधात लढताना काही गोष्टी स्विकाराव्या लागतात, काही गोष्टींचा त्याग करावा लागतो

आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होत आहे. या पत्रकार परिषदेत सांगली, भिवंडीबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर आज संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला संजय राऊत म्हणाले की, ज्यार्थी आम्ही एकत्र येऊन पत्रकार परिषद घेत आहोत. तीन पक्ष आणि इतर आमचे घटक पक्ष. त्याअर्थी आमच्या दृष्टीने कोणताही वाद उरलेला नाही. एकत्र बसू आणि चर्चा करु. आघाडीमध्ये एखाद - दुसऱ्या जागेवरुन शेवटपर्यंत चर्चा होत असतात आणि ते अपेक्षित आहे. अनेकवर्ष वेगवेगळ्या पद्धतीने काम करताना आपण एकत्र येतो. प्रत्येक जागेवरती आमचे कार्यकर्ते काम करत असतात. सांगलीसुद्धा मी मानतो की भिवंडीसुद्धा मानतो. काँग्रेस तिकडे अनेकवर्ष लढत आली. मी विश्वजित कदम आणि विशाल पाटील या दोन्ही सांगलीकर नेत्यांच्या भावनेशी मी सहमत आहे. एक राजकीय कार्यकर्ता म्हणून.

तसेच संजय राऊत पुढे म्हणाले की, त्याचप्रमाणे भिवंडीतीलसुद्धा राजकीय कार्यर्त्यांच्या भूमिकांशी मी सहमत आहे. रामटेक, अमरावती, कोल्हापूर इथे आमच्या जागा आम्ही काँग्रेसला सोडल्या. तेथील शिवसैनिकांच्या ज्या भावना आहेत जागा सोडण्यासंदर्भात त्यांच्याशी मी सहमत आहे. शेवटी या देशात आपल्याला हुकूमशाहीविरोधात लढताना काही गोष्टी स्विकाराव्या लागतात आणि काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. असे संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com