“राज्यातील सरकार गेंड्याच्या कातडीचं; संजय राऊतांचं शिंदे सरकारवर टीकास्र

“राज्यातील सरकार गेंड्याच्या कातडीचं; संजय राऊतांचं शिंदे सरकारवर टीकास्र

संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहे. आज नाशिकमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
Published by :
Siddhi Naringrekar

संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहे. आज नाशिकमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे सरकारवर सडकून टीका केली आहे. राऊत म्हणाले की, “महाराष्ट्राला इतिहास आहे. पूर्वी एखाद्या मंत्र्यावर किंवा मुख्यमंत्र्यांवर न्यायालयाने थोडे जरी ताशेरे ओढले, तरी ते राजीनामा देत होते. बॅरिस्टर अंतुले, शिवाजीराव पाटील निलंगेकर, अशी अनेक उदाहरणं आहेत. मात्र, एका अधिवेशनात मुख्यमंत्र्यांसह सहा मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीस आली. तेही पुराव्यासह तरीही सरकार ठंब्याप्रमाणे बसून आहे. असे राऊत म्हणाले.

यासोबतच राज्यातील सरकार गेंड्याच्या कातडीचं असून रोज एका मंत्र्याच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण पुढे येत असताना हे सरकार पाण्यात बसलेल्या म्हशी सारखं बसून आहे. “काही दिवसांपूर्वी आम्ही नागपूरमध्ये होतो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही तिथे उपस्थित होते. सरकारचा गोंधळ आम्हाला जवळून बघता आला. मुळात हे सरकार अस्तित्वातच नाहीये. रोज एका मंत्र्याच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं पुढे येत आहेत. असे म्हणत राऊतांची सरकारवर हल्लाबोल केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com