राज्य सरकारच्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यावर संजय राऊतांची टीका; म्हणाले, मग काय उपकार करताय का?

राज्य सरकारच्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यावर संजय राऊतांची टीका; म्हणाले, मग काय उपकार करताय का?

रायगडावर मोठ्या दिमाखात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता.
Published by  :
Siddhi Naringrekar

रायगडावर मोठ्या दिमाखात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. त्याला तिथीनुसार आज ३५० वर्षं पूर्ण झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा आज तिथीनुसार 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर पार पडत आहे.

याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, जगभरात शिवाजी महाराजांची वाहवा केली जाते. त्यामुळे छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा उत्तम प्रकारे करणं हे महाराष्ट्रातील प्रत्येक राज्यकर्त्याचं कर्तव्य आहे.त्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आम्ही राज्य चालवतो. तुम्ही राज्याभिषेक सोहळा साजरा करता, मग उपकार करताय का? असे संजय राऊत म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com