Sheetal Kardekar : पत्रकार नोंदणी आणि वेतन आयोगासाठी शीतल करदेकरांचा बुलंद आवाज

Sheetal Kardekar : पत्रकार नोंदणी आणि वेतन आयोगासाठी शीतल करदेकरांचा बुलंद आवाज

आर्थिक,सामाजिक मानसिक सुरक्षेसाठी हे होणे अत्यावश्यक आहे." असे शीतल हरीष करदेकर (मुंबई), राष्ट्रीय अध्यक्ष मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया (माई) तसेच कार्यकारी संपादक- दैनिक द ग्लोबल टाइम्स यांनी 'धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघा' तर्फे 'माध्यमकर्मींचे हक्क आणि अधिकार' या विषयावर आयोजित परिसंवादात सांगितले.
Published by :
Riddhi Vanne
Published on

पत्रकार,पत्रकारेतर कर्मचाऱ्यांना वेतन आयोग नाही. तसेच पत्रकारांची सरकारकडे नोंदणी देखील नाही.खऱ्या पत्रकारांना हक्क आणि अधिकार मिळायचे असतील तर पत्रकार नोंदणी,अर्थात गणना व्हायला हवीच, यात जो नोंद क्रमांक मिळेल तोच माध्यमकर्मीच्या कामाचे रेकॉर्ड अपडेट करणारा, असेल.आर्थिक,सामाजिक मानसिक सुरक्षेसाठी हे होणे अत्यावश्यक आहे." असे शीतल हरीष करदेकर (मुंबई), राष्ट्रीय अध्यक्ष मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया (माई) तसेच कार्यकारी संपादक- दैनिक द ग्लोबल टाइम्स यांनी 'धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघा' तर्फे 'माध्यमकर्मींचे हक्क आणि अधिकार' या विषयावर आयोजित परिसंवादात सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार बापू ठाकूर हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून माई संघटनेचे उपाध्यक्ष तथा संभाजीनगर येथील जेष्ठ पत्रकार अब्दुल कदीर, माईचे मुंबई जिल्हाध्यक्ष चेतन काशीकर यांच्यासह पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर पाटील, विद्यमान अध्यक्ष मनोज गर्दे, उपाध्यक्ष अतुल पाटील मंचावर उपस्थित होते.

परिसंवादात शीतल करदेकर यांनी विषयाची मांडणी करताना सांगितले की, "पत्रकारांना वेतन आयोग नाही. आपण आपले हक्क मालकांकडे मागत असतो. सरकारकडे पत्रकारांची नोंदणी देखील नाही. आपली सरकारने नोंदणी केली पाहिजे. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या हितासाठी पत्रकार महामंडळ स्थापन झाले पाहिजे यासाठी आम्ही लढा देत आहोत. मी यासाठी आमरण उपोषण देखील केले आहे. महामंडळ स्थापन झाल्यास पत्रकारांच्या अनेक समस्या सुटणार आहे. खऱ्या पत्रकारांना त्यांचे अधिकार मिळणार आहेत. मंजुर झालेल्या महामंडळाची सुरुवात महाराष्ट्रातून झाली पाहिजे. तर महाराष्ट्र देशाचा दिशादर्शक ठरेल." असे देखील शीतल करदेकर म्हणाल्या.

ज्येष्ठ पत्रकार अब्दुल कदीर यांनी सांगितले की, "मी गेल्या ४० वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. पत्रकारांच्या समस्या व हक्क यासाठी महामंडळ झाले पाहिजे, यासाठी आम्ही लढा देत आहोत. शीतलताई नेहमी पत्रकारांच्या समस्यांबाबत आवाज उठवत असतात. तसेच अधिस्वीकृती धारकांसह सर्व पत्रकारांना सुविधा अधिकार मिळायला पाहिजेत अशी देखील माईची मागणी आहे. तसेच पत्रकारांनी प्रत्येक क्षेत्राची रिपोर्टिंग केली पाहिजे. त्यामुळे त्यांचा अनुभव देखील वाढत जाणार आहे." कदिर यांनी त्यांना आलेले अनेक अनुभव पत्रकारांना सांगितले.

चेतन काशीकर मुंबई जिल्हा अध्यक्ष म्हणाले की, "आधीच्या पत्रकारांचे नेटवर्क होते. त्यामुळे आपल्याला अचूक बातमी मिळत होती. मात्र आज कोणीही स्वतःला पत्रकार म्हणवून घेत आहे. आज सरकारकडे पत्रकाराचा डेटा देखील नाही आहे. आज पत्रकारांसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे पत्रकार महामंडळाची अत्यंत गरजेचे आहे. आपली भाषा सर्वसामान्य नागरिकांशी जुळणारी असावी. प्रत्येक पत्रकारांने मिशन मॉडल तयार केले पाहिजे." असे देखील काशीकर यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार बापुसाहेब ठाकूर यांनी अध्यक्षीय भाषणातून सांगितले की, "आपली बाजू सत्य असली पाहिजे. म्हणजे आपल्याला यश देखील मिळत असते. तसेच पत्रकाराने स्वतःला अपडेट करत राहिले पाहिजे, या पत्रकार संघात अनेक उपक्रम सुरु असतात. व ते पाहून आनंद होत असतो." असे गौरवोद्गार बापू ठाकूर यांनी काढले.

प्रास्तविक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर पाटील यांनी तर सूत्रसंचालन राकेश गाळणकर यांनी केले. सचिव सचिन बागुल यांनी आभार मानताना सांगितले की, माईच्या सर्व लढाईत आम्ही सोबत असू ." यावेळी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे, उपाध्यक्ष अतुल पाटील, सचिव सचिन बागुल, कोषाध्यक्ष तुषार बाफना, मुंबई प्रांतिक प्रतिनिधी प्रकाश शिरसाठ, माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे, माजी अध्यक्ष चंद्रशेखर पाटील, माजी अध्यक्ष नुरखान पठाण, माजी अध्यक्ष सुनील पाटील, सिद्धार्थ पारेराव, प्रा. मोहन मोरे, प्रभा परदेशी, रवींद्र नगराळे, मनीष मासोळे, पंकज पाटील, दिपक वाघ, धनंजय गाळणकर, दिपक शिंदे, सनी सोनवणे, गोरख गर्दे, सुधाकर चिंचोले, दिनेश निकुंभ, राकेश गाळणकर, जमील शाह, अनिस खाटीक, प्रितम सुर्यवंशी, श्रीकृष्ण बेडसे, फैसल शाह, धनंजय गाळणकर, संदीप त्रिभुवन, सय्यद सानिल आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com