महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा आज दुसरा दिवस
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा आज दुसरा दिवस आहे. आज पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. काल ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनुसिंघवी यांनी चार तासांपेक्षा जास्त युक्तिवाद केला. कोर्टाची वेळी 4 वाजता संपल्यामुळं सुनावणी दुसऱ्या दिवशीवर ढकलली गेली होती. आज शिंदे गटाचे वकील हरिष साळवे युक्तिवाद करतील.
शिंदे गटाकडून हरीश साळवे यांनी युक्तीवाद केला. तर शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला आहे. यावेळी साळवे यांनी नबाम रेबिया निकालाचा दाखला दिला. पण, कोर्टाने नबाम रबिया प्रकरणाचे परिणाम होणार नाही, असे सांगितले. शिवसेनेनं जोरदार युक्तिवाद केल्यानंतर आज शिंदे गट आपली बाजू मांडणार आहे. पहिल्या दिवशी कोर्टाने महत्त्वाचे मत नोंदवले आहे.
काल ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनुसिंघवी यांनी चार तासांपेक्षा जास्त युक्तिवाद केला. कोर्टाची वेळी 4 वाजता संपल्यामुळं सुनावणी दुसऱ्या दिवशीवर ढकलली गेली होती. आज शिंदे गटाचे वकील हरिष साळवे युक्तिवाद करतील.