रत्नागिरीच्या भाट्ये समुद्रात बोट बुडाली

रत्नागिरीच्या भाट्ये समुद्रात बोट बुडाली

रत्नागिरीच्या भाट्ये समुद्रात बोट बुडाल्याची माहिती मिळत आहे. या बोटीत एकूण पाच जण होते. तिंघाना वाचवण्यात यश आलं असून दोन जण अद्यापही बेपत्ता आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

रत्नागिरीच्या भाट्ये समुद्रात बोट बुडाल्याची माहिती मिळत आहे. या बोटीत एकूण पाच जण होते. तिंघाना वाचवण्यात यश आलं असून दोन जण अद्यापही बेपत्ता आहे. ही बोट नेमकी कशी बुडाली याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. छोट्या बोटीने मासेमारी करण्यासाठी ही बोट निघाली होती.

पाच जण मासेमारीसाठी रत्नागिरीच्या भाट्ये समुद्रात उतरले होते. मासेमारी सुरू असतानाच अचानक ही बोट बुडाली. तातडीने बचाव कार्य सुरू झाले. या बोटीमध्ये एकूण पाच जण होते, त्यापैकी तिघांना वाचवण्यात यश आलं आहे. तर अद्यापही दोन जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com