चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगची प्रक्रिया सुरु

भारताची चांद्रयान ३ ही मोहिम आता य़शस्वी होण्याच्या मार्गावर आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : भारताची ‘चांद्रयान-२’ ही मोहिम चार वर्षांपूर्वी थोडक्यात अयशस्वी ठरली होती. त्यानंतर चार वर्षांनी भारताची चांद्रयान ३ ही मोहिम आता य़शस्वी होण्याच्या मार्गावर आहे. बुधवारी हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर संध्याकाळी 5 वाजून 44 मिनिटांनी चंद्रभूमीला स्पर्श करेल. आणि भारत इतिहास रचेल. याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. दक्षिण ध्रुवावर चांद्रयान ३ उतरणं हे भारताच्या दृष्टीनं दैदिप्यमान यश असेल, असं इस्रोचे माजी चेअरमन डॉ. के. सिवन यांनी म्हंटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com