India Pakistan War : ऑपरेशन सिंदूरनंतर लक्ष दाऊदकडे, स्पेशल रिपोर्ट वाचा एका क्लिकवर

India Pakistan War : Operation Sindoor नंतर लक्ष दाऊदकडे, स्पेशल रिपोर्ट वाचा एका क्लिकवर

ऑपरेशन सिंदूर: पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला, आता दाऊदला धडा शिकवण्याची मागणी.
Published by :
Riddhi Vanne
Published on

पहलगाम हल्ल्याचा Pahalgam attack बदला भारताने घेतला. ऑपरेशन सिंदूर Operation Sindoor यशस्वी करत भारताने पाकिस्तानला धडा शिकवला. भारताकडे वाकड्या नजरेनं बघणाऱ्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल, असा संदेशही देण्यात आला. मात्र आता 1993 साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाचा bomb blast बदला घ्या अशी मागणी होऊ लागली आहे. या बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड असलेल्या दाऊद इब्राहिम Dawood Ibrahim ला कंठस्नान घाला, अशा मागणीने जोर धरला आहे.

जम्मू-काशमिर Jammu and Kashmir च्या पहेलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. त्यात 26 पर्यटकांचा बळी गेला. त्याचा बदला आपल्या शूर जवानांनी घेतला. ऑपरेशन सिंदूर यशस्वी करत भारताने दहशतवाद्यांचे पाकिस्तानमधले 9 अड्डे बेचिराख केले. आता या कारवाईनंतर देशाचा सर्वात मोठा गुन्हेगार दाऊद इब्राहिमला देखील कंठस्नान घालण्याची मागणी होत आहे.

प्रीती देशमुख यांचे चिरंजीव तुषार देशमुख यांनी लोकशाही मराठीसोबत साधला. त्यावेळेस ते म्हणाले की, "तर 1993 साली स्टॉक एक्सचेंज येथे झालेल्या स्फोटात कीर्ती अजमेरा गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यावर ४० सर्जरी करण्यात आल्या. त्यांनीही दाऊदला आता पाकिस्तानात घुसून कंठस्नान घाला अशी मागणी केली".

बॉम्बस्फोटातील जखमी कीर्ती अजमेरा यांनी लोकशाही मराठीसोबत संवाद साधला. त्यावेळेस त्या म्हणाल्या की, "पहेलगाममध्ये पर्यटकांना कसलीही कल्पना नसताना दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. तशीच परिस्थिती मुंबईच्या बॉम्बस्फोटावेळीही होती. मुंबईकर रोजच्याप्रमाणे आपापल्या कामात व्यस्त होता. आणि अचानक 12 बॉम्बस्फोट झाले. ज्यात शेकडो मुंबईकरांचा जीव गेला. त्यामुळे या बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड असलेल्या दाऊदला कायमची अद्दल घडवण्याची मागणी होऊ लागली आहे".

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com