Ravindra Chavan : दुबईत 'महा हेल्पलाइन'च्या माध्यमातून मराठी लोकांना मिळणार २४ तास मदत - रविंद्र चव्हाण
व्यवसाय आणि नोकरीनिमित्त दुबईमध्ये राहणाऱ्या दीड लाख मराठी भाषिकांकरिता नुकतीच महाराष्ट्र परिषदेची स्थापना करण्यात आली. या कार्यक्रमात संयुक्त अरब राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी स्थापना केलेल्या इंडियन पीपल्स फोरमची संस्था म्हणून ही परिषदेत कार्यरत राहणार आहे. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत 'दुबईत महाराष्ट्र कौन्सिल'ची मुहूर्तमेढ रविवार, दि ४ मे रोजी रोवली गेली आहे.
या सोहळ्याच्या स्थापनाप्रसंगी बोलताना रविंद्र चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्र काउन्सिलच्या 'महा हेल्पलाइन' आणि 'युनायटेड महाराष्ट्र प्लॅटफॉर्म' या अत्यंत महत्त्वाचा आहे. या उपक्रमांमुळे दुबईस्थित मराठी माणसांचा आवाज अधिक बुलंद होईल, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिक बळ मिळेल. तसेच महाराष्ट्र सरकारर आणि आयपीएफ यांच्यातील समन्वय वाढेल. तर काही कारणाने अडचणीत सापडलेल्या युएईस्थित मराठी लोकांना त्यांच्या मातृभाषेतून मदत उपलब्ध व्हावी, या उद्देशाने "050 365 HELP" ही 'महा हेल्पलाइन' सेवा २४ तास उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याद्वारे शासकीय आणि कायदेशीर मदतीसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे.
त्याचबरोबर 'युनायटेड महाराष्ट्र' या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून युएईच्या सामाजिक क्षेत्रांत कार्यरत आहे. ४० संस्था एका छताखाली आल्या आहेत, यामुळे महाराष्ट्राचा एकतेचा संदेश युएईमध्ये सर्वदूर पोहोचेल" असे प्रतिपादन रवींद्र चव्हाण यांनी केले. युएईमध्ये राहणाऱ्या भारतीयांची सद्य:स्थिती, त्यांच्या समस्या आणि प्रश्न समजून घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजपाच्यावतीने सर्वतोवरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन रवींद्र चव्हाण यांनी दिले. दुबईत मराठमोळ्या पद्धतीने आणि मोठ्या दिमाखात संपन्न झालेल्या या सोहळ्यात युएईमधील व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्राचे नाव उंचावणाऱ्या 'ग्लोबल महाराष्ट्रिय' व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्यात आला.
"इंडियन पीपल्स फोरम (IPF), याची स्थापना २०१३ मध्ये युएईमध्ये झाली होती. IPF ही युएईमधील भारतीय प्रवासी समुदायाला पाठिंबा देणारी सर्वात मोठी सामाजिक-सांस्कृतिक संघटनांपैकी एक आहे. IPF युएई २३ विभागांमध्ये कार्य करते. ज्यामध्ये अमीरातीप्रमाणे अध्याय, १२ राज्य परिषदा, एक बिझनेस कौन्सिल आणि खास तरुणांसाठी IPF युवा व महिलांसाठी IPF महिला परिषद यांचा समावेश आहे. IPF युएईचे १०,००० हून अधिक सक्रिय समर्थक आहेत. IPF युएईने 'मरहबा मोदी २०१५' व 'अह्लान मोदी २०२४' सारख्या युएईतील काही सर्वात मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. राहुल तुळपुळे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले.
भाजपा कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की या व्यतिरिक्त दुबईतील 'दुबई बिजनेस कम्युनिटी' आणि 'दुबई महाराष्ट्र मंडळाच्या' सदस्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यात कृतार्थ राजा, सागर देसाई, सबिना खोत, दिलावर दलवाई, प्रिया जाधव, प्रसाद दातार, सचिन जोशी, अमोल वैद्य, के. जी. नारकर, राकेश पाटील, शिरीष पटवर्धन, विजेंद्र सुर्वे, राहुल तुळपुळे, रवी चिटणीस, सुहास रेगे, रोहित आगले, IPFचे राहुल तुळपुळे आणि भाजपा आमदार निरंजन डावखरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्राच्या औद्योगिक, आर्थिक व सामाजिक विकासाच्या अनुषंगाने अनेक महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. तसेच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरांविषयी अनेक सकारात्मक मुद्द्यांवर विचारांची देवाण-घेवाण झाली असे रविंद्र चव्हाण यांनी नमूद केले.
रवींद्र चव्हाण यांनी दौऱ्यादरम्यान BAPS हिंदू मंदिराचे मनोभावे दर्शन घेतले आणि सायंकाळी मंदिरात होणाऱ्या गंगा आरतीमध्ये सहभाग घेतला. यावेळी BAPS हिंदू मंदिर ट्रस्टचे चेअरमन श्री. अशोक कोटेचा यांनी देवस्थानाच्या वतीने स्वागतपर सत्कार केला. याप्रसंगी BAPS हिंदू मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांशी हिंदू धर्म संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याच्या अनुषंगाने विविध विषयांवर रविंद्र चव्हाण यांनी चर्चा केली. भारत आणि यूएई यांच्यातील मैत्री ही दोन देशांच्या सांस्कृतिक आणि आर्थिक बंधनांचा सुंदर संगम असून यात महाराष्ट्राची भूमिका विशेष आहे, असे रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.
'गल्फ एज्युकेशन अँड फायनान्स'चे विशाल साळुंखे, अक्षय पाटील, 'ज्युपिटर ग्लोबल मार्केट'चे सागर पाटील, 'अधीरा ज्वेलर्स'चे प्रकाश पवार आणि 'नमो रिफायनरी'चे विनायक देशमुख, या सांगली जिल्ह्याच्या दुबईस्थित सुपुत्रांनी स्थानिक आहेत. त्यांनी आपल्या व्यावसायिक कर्तृत्वाने दुबईमध्ये महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. तसेच दुबईतील पेशवा रेस्टॉरंट येथे 'ब्ल्यू-कॉलर कामगार सेवा कार्यक्रम' संपन्न झाला. दुबईतील मराठी ब्लू-कॉलर कामगार, घरगुती साहाय्यक, समुदाय स्वयंसेवक कामगार यांचीही मोठी संख्या असून त्यांचे दुबई आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत मोलाचे सहकार्य आहे. सुरेश कुंभार, अनिता जाधव आणि गणेश माने या मराठी श्रमिकांचे कर्तृत्व युएईमध्येही अधोरेखित झालं आहे.