BCCI New Rules List : BCCI ने आणली 10 कठोर नियम, पाळले नाही तर...

BCCI New Rules List : BCCI ने आणली 10 कठोर नियम, पाळले नाही तर...

BCCI ने भारतीय क्रिकेट संघासाठी 10 नवीन कठोर नियम जारी केले आहेत. या नियमांचे पालन न केल्यास खेळाडूंना कठोर शिक्षा होणार आहे. जाणून घ्या कोणते आहेत हे नियम.
Published by :
shweta walge
Published on

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गुरुवारी राष्ट्रीय संघासाठी नवीन 10 नियम जारी केले आहेत. मागच्या काही महिन्यापासून टीम इंडिया सातत्याने खराब प्रदर्शन करतेय. आधी श्रीलंकेविरुद्ध वनडे सीरीज, त्यानंतर न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सीरीज आणि अलीकडे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वीकारावा लागलेला दारुण पराभव झाला. इतकच नाही तर ऑस्ट्रेलियात दौऱ्यात टीममध्ये अंतर्गत मतभेद झाल्याच्या बातम्या समोर आल्या. टीमची खालावलेली कामगिरी आणि ड्रेसिंग रुममधील वादाच्या बातम्या समोर आल्यानंतर BCCI काही कठोर पावल उचलेली आहेत.

बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की जर कोणी खेळाडू किंवा कर्मचारी हे नियम पाळले नाहीत तर त्याला कठोर शिक्षा होईल. या धोरणाचे पालन न करणाऱ्या खेळाडूंना दंड आकारला जाईल, ज्यामध्ये त्यांचे रिटेनर फी केंद्रीय करारातून वजा करणे आणि आयपीएलमध्ये भाग घेण्यास बंदी घालणे समाविष्ट असू शकते. यातली एक महत्त्वपूर्ण नियम म्हणजे बॅगेजची पॉलिसी.

1. देशांतर्गत क्रिकेट खेळणे आवश्यक असणार

भारतीय खेळाडूंना निश्चितच देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागेल. हे अनिवार्य करण्यात आले आहे. भारतीय संघातील खेळाडूंची निवडही यावर आधारित असेल. खरंतर, बीसीसीआयला असे वाटते की या मोहिमेमुळे वरिष्ठ आणि कनिष्ठ खेळाडूंमध्ये चांगले संबंध निर्माण व्हावेत, जेणेकरून संघ आणि क्रिकेटचे वातावरण चांगले होईल.

जर एखाद्या खेळाडूला कोणत्याही कारणास्तव देशांतर्गत क्रिकेट खेळायचे नसेल तर त्याला बीसीसीआयला त्याबद्दल माहिती द्यावी लागेल. याशिवाय, निवड समितीच्या अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागेल. देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासोबतच खेळाडूंना त्यांची तंदुरुस्तीही राखावी लागेल.

2. कुटुंबासह प्रवास करता येणार नाही

प्रत्येक खेळाडूला संघासोबत प्रवास करावा लागेल असा कडक नियमही करण्यात आला आहे. याचा अर्थ खेळाडू त्यांच्या कुटुंबियांसोबत प्रवास करू शकणार नाहीत. जर या नियमाचे उल्लंघन झाले तर कठोर शिक्षा दिली जाईल. जर त्याला त्याच्या कुटुंबासह किंवा स्वतंत्रपणे प्रवास करायचा असेल तर त्याला मुख्य प्रशिक्षक आणि निवड समितीच्या अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागेल.

3. दौऱ्यावर जास्त सामान घेऊन जाता येणार नाही

दौऱ्यावर असताना कोणताही खेळाडू जास्तीचे सामान घेऊन जाऊ शकणार नाही. जर तुमच्या सामानाचे वजन जास्त असेल तर तुम्हाला ते स्वतः द्यावे लागेल. बीसीसीआयने वजन आणि सामानासाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी केली आहेत.

या सामनासाठी धोरण असे आहे

मोठा दौरा (30 दिवसांपेक्षा जास्त)

खेळाडू - 5 तुकडे (3 सुटकेस + 2 किट बॅग) किंवा 150 किलो पर्यंत.

सहाय्यक कर्मचारी - 2 तुकडे (2 मोठे + 1 लहान सुटकेस) किंवा 80 किलो पर्यंत.

छोट्या दौऱ्यासाठी (30 दिवसांपेक्षा कमी) :

खेळाडू - 4 तुकडे (2 सुटकेस + 2 किट बॅग) किंवा 120 किलो पर्यंत.

सहाय्यक कर्मचारी - 2 तुकडे (2 सुटकेस) किंवा 60 किलो पर्यंत.

होम सिरीज

खेळाडू - 4 तुकडे (2 सुटकेस + 2 किट बॅग) किंवा 120 किलो पर्यंत.

सहाय्यक कर्मचारी - 2 तुकडे (2 सुटकेस) किंवा 60 किलो पर्यंत.

4. सेंटर ऑफ एक्सलन्स बंगळुरूला स्वतंत्रपणे पाठवणे

प्रत्येक खेळाडूला बंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्सला सामान किंवा वैयक्तिक वस्तू पाठवण्यासाठी संघ व्यवस्थापनाशी संपर्क साधावा लागेल. जर एखादी वस्तू वेगळ्या पद्धतीने पाठवली गेली, तर होणारा अतिरिक्त खर्च खेळाडूला करावा लागेल.

5. कोणत्याही दौऱ्यात किंवा मालिकेत वैयक्तिक कर्मचाऱ्यांवर निर्बंध

वैयक्तिक कर्मचाऱ्यांना (जसे की वैयक्तिक व्यवस्थापक, स्वयंपाकी, सहाय्यक आणि सुरक्षा) कोणत्याही दौऱ्यात किंवा मालिकेत सहभागी होण्यास बंदी घातली जाईल. जोपर्यंत यासाठी बीसीसीआयची परवानगी घेतली जात नाही.

6. सराव सत्रादरम्यान उपस्थित राहणे आवश्यक आहे.

बीसीसीआयने एक कडक नियमही बनवला आहे की आता प्रत्येक खेळाडूला सराव सत्रादरम्यान उपस्थित राहावे लागेल. कोणताही खेळाडू सराव सत्र लवकर सोडू शकणार नाही. मालिका किंवा स्पर्धेदरम्यान, तुम्हाला संघासोबत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करावा लागेल. भारतीय बोर्डाने खेळाडूंमधील बंधनासाठी हा नियम बनवला आहे.

7. कोणताही खेळाडू जाहिरात करू शकणार नाही.

खेळाडूंना यापुढे मालिका आणि वेगवेगळ्या दौऱ्यांदरम्यान वैयक्तिक शूटिंग करण्याची परवानगी राहणार नाही. या काळात कोणताही खेळाडू जाहिरात करू शकणार नाही. खेळाडूंचे लक्ष दुसरीकडे जाऊ नये म्हणून बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.

8. परदेश दौऱ्यात कुटुंबासोबत जास्त वेळ घालवता येणार नाही

जर एखादा खेळाडू 45 दिवसांसाठी परदेश दौऱ्यावर राहिला तर त्याची पत्नी आणि 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे मूल त्याच्यासोबत मालिकेत दोन आठवडे राहू शकते. या काळात, त्यांच्या राहण्याचा खर्च बीसीसीआय करेल परंतु उर्वरित खर्च खेळाडूला करावा लागेल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com