India vs Australia Women Semifinal: आज टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया एकमेकांशी भिडणार; कोण मारणार बाजी?
Admin

India vs Australia Women Semifinal: आज टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया एकमेकांशी भिडणार; कोण मारणार बाजी?

दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जात असलेल्या महिला T20 विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना 23 फेब्रुवारी (गुरुवार) रोजी होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जात असलेल्या महिला T20 विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना 23 फेब्रुवारी (गुरुवार) रोजी होणार आहे. हा सामना भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांमध्ये होणार आहे. केपटाऊन येथील न्यूलँड्स मैदानावर दोन्ही संघांमधील सामना रंगणार आहे.

भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा रेकॉर्ड खूपच खराब आहे. 30 पैकी संघाने फक्त 6 सामने जिंकले आहेत. टीमने 3 वर्षांपासून ऑस्ट्रेलियाकडून एकही टी-20 सामना जिंकलेला नाही. 21 फेब्रुवारी 2022 रोजी भारताने ऑस्ट्रेलियाचा शेवटचा पराभव केला होता. तेव्हापासून दोन्ही संघांमध्ये 11 सामने झाले असून एकही संघ भारत जिंकू शकलेला नाही. त्यांना 9 सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. एक सामना अनिर्णित राहिला तर एक सामना बरोबरीत राहिला.

संघ खालीलप्रमाणे आहेत.

भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया, रिचा घोष, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवानी, पूजा वस्त्रकर, राजेश्वरी गायकवाड आणि शिखाडे.

ऑस्ट्रेलिया: मेग लॅनिंग (क), अॅलिसा हिली, डी'आर्सी ब्राउन, ऍशले गार्डनर, किम गर्थ, हेदर ग्रॅहम, ग्रेस हॅरिस, जेस जोनासेन, अलाना किंग, ताहलिया मॅकग्रा, बेथ मूनी, एलिस पेरी, मेगन शूट, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेअरहॅम.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com