Wardha: खरेदी हमीभावाप्रमाणे होत नसल्यानं शेतकरी संतप्त, वैतागून पेटवला कापूस

वर्ध्यात संतप्त शेतकऱ्याने विक्रीस आणलेला कापूस वाहनातच पेटवण्याचा प्रयत्न केला. वाहनात भरलेल्या कापसावर संतप्त शेतकऱ्याने माचीसची काडी फेकली.
Published by :
Team Lokshahi

वर्ध्यात संतप्त शेतकऱ्याने विक्रीस आणलेला कापूस वाहनातच पेटवण्याचा प्रयत्न केला. वाहनात भरलेल्या कापसावर संतप्त शेतकऱ्याने माचीसची काडी फेकली. सकाळी दहा वाजता पासून शेतकऱ्याने विक्रीसाठी कापूस आणला होता, सायंकाळपर्यंत विक्री झाली नाही त्यामुळे शेतकरी संतप्त झाला.

वर्ध्यात शेतकऱ्याच्या कापसाला नोंदणी नसल्यानं खरेदीला नकार मिळाला होता. यामुळं संतप्त शेतकऱ्यानं संपूर्ण कापूसचं पेटवून दिल्याचा प्रकार घडलाय. अमोल ठाकरे असं या शेतकऱ्याचं नाव आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com