Maharashtra Mantralaya : 'या' कारणामुळे मंत्रालयात सामान्यांसाठीचा प्रवेश पास बंद

मंत्रालयात सामन्यांसाठी प्रवेश पास बंद करण्यात आला आहे. प्रवेश पास देणाऱ्या संगणकात बिघाड झाली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

डिजिटल इंडियाचे स्वप्न उराशी बाळगले असले तरी ई-सेवा केंद्रातील कामकाज अनेकवेळा इंटरनेटअभावी खोळंबते. सरकारी कार्यालयातील सर्व्हर वारंवार डाऊन असतात. मंत्रालयात सामन्यांसाठी प्रवेश पास बंद करण्यात आला आहे. प्रवेश पास देणाऱ्या संगणकात बिघाड झाली आहे.

राज्यभरातून आलेल्या सामन्यांच्या खोळंबा झाला आहे. प्रवेश पास देणाऱ्या संगणकांचं पास मात्र युद्ध पातळीवर सुरु आहे. त्यामुळे मंत्रालयातील प्रवेश पत्रिका विभाग व इतर काही विभागातील कामांवर परिणाम झाला. इंटरनेट सेवा बंद पडल्यामुळे नागरिकांची गेटवर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन गैरसोय झाली. परिणामी गेटवर नागरिकांची मोठी गर्दी झाली. इंटनेट नसल्याने ऑनलाईन सेवा ठप्प झाल्या होत्या. त्यामुळे काही लेखी पास मिळण्यास सुरुवात केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com