Eknath Khadse: देवेंद्र फडणवीसांवर जरांगेंचे गंभीर आरोप, खडसे काय म्हणाले पाहा?

मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांवर अत्यंत गंभीर आरोप केला आहे.
Published by :
Team Lokshahi

मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असून आजच्या भाषणात बोलल्याप्रमाणे ते आंदोलनास्थळावरून मुंबईमधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. यावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांवर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत, त्यामुळे त्यांना विष देऊन मारुन टाकण्याचं कट रचण हा जो आरोप आहे या आरोपाची चौकशी गृहमंत्री या नात्याने त्यांनी केली पाहीजे आणि जे सत्य आहे ते जनते समोर आलं पाहीजे, असं एकनाथ खडसे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com