CM Eknath Shinde | 'कुणाचा बाप आला तरी...' ; मुख्यमंत्र्यांचं विरोधकांवर टीकास्त्र तर लाडक्या बहिणींना केलं 'हे आवाहन'

महाराष्ट्रात मोदींच्या योजनेमुळे एक कोटी महिला लखपती दीदी करायच्या आहेत.
Published by :
Dhanshree Shintre

'कुणाचा बाप जरी आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही,' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. हे सरकार हप्ते सरकार नाही असं मुख्यमंत्री शिंदेंनी वक्तव्य केलं आहे.

महाराष्ट्रात मोदींच्या योजनेमुळे एक कोटी महिला लखपती दीदी करायच्या आहेत. तुमच्या खात्यात पैसे गेल्याचा आनंद आम्हाला होत आहे मात्र तुमच्या सावत्र भावांना याचा त्रास होतोय. ही योजना बंद करण्यासाठी हे न्यायालयात गेले, काँग्रेसचे अधिकृत निवडणूक प्रमुख यांनी योजना बंद करायला याचिका दाखल केली त्यामुळे ही योजना सुरु ठेवयाला तुमचा आशीर्वाद राहू द्या असं आवाहन मुख्यमंत्री शिंदेंनी लाडक्या बहिणींना केलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com