महायुतीतील जागावाटपाचा तिढा आज सुटणार?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आज महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ठाणे आणि नाशिक दोन्ही जागा शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे.

पुढील २४ तासात महायुतीच्या उर्वरित सर्व जागांची घोषणा महायुतीकडून केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. ठाण्यातून रवींद्र फाटक आणि प्रताप सरनाईक यांचे नाव आघाडीवर आहेत तर दक्षिण मुंबईतून यामिनी यशवंत जाधव आणि मंगलप्रभात लोढा यांच्या नावाची चर्चा आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com