Prakash Ambedkar | उल्हासनगरमधील शिवसेना-भाजप वादावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

मी असं म्हणेल की हे दुर्दैव आहे. राजकारणाचा अस्त्र या ठिकाणी पूर्णपणे घसरलेला आहे आणि जिथे मसल पावर नव्हतं, ती आता मसल पावर सुद्धा यायला लागली आहे.

मी असं म्हणेल की हे दुर्दैव आहे. राजकारणाचा अस्त्र या ठिकाणी पूर्णपणे घसरलेला आहे आणि जिथे मसल पावर नव्हतं, ती आता मसल पावर सुद्धा यायला लागली आहे. म्हणजे सत्ता, पैसा आणि आता त्याला मसल पावर जोडले गेले आहे. त्यामुळे या घटनेचा सर्वांनी निषेध केला पाहिजे. तुमचे कितीही या लोकशाहीमध्ये मतभेद असतील, तरी तुम्ही राजे नाही. तुम्हाला लोक राजे बनवतात, तेव्हा ती मर्यादा राहून लोकशाहीमध्ये निवडून आलेल्या आमदारांनी आपल्या स्वतःवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. आता या जनतेला माझं आवाहन आहे, आता हे जे स्वतःला राजे समजतात त्यांना पहिल्यांदा घरी बसवा, त्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही. असा आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केल आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com